शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

'नागरिकांना ‘अच्छे दिन’ दिसलेच नाहीत, मोरारजी देसाई यांचा कित्ता गिरवणार नाही' - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 12:53 IST

Sharad Pawar: केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’ची घोषणा केली होती. पण ‘अच्छे दिन’ देशातील नागरिकांना आजपर्यंत दिसले नाहीत. त्यानंतरच्या २०२२ ला ‘अच्छे दिन’चे विस्मरण होऊन सत्ताधाऱ्यांनी ‘न्यू इंडिया २०२२’ चे आश्वासन दिले.

ठाणे : केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’ची घोषणा केली होती. पण ‘अच्छे दिन’ देशातील नागरिकांना आजपर्यंत दिसले नाहीत. त्यानंतरच्या २०२२ ला ‘अच्छे दिन’चे विस्मरण होऊन सत्ताधाऱ्यांनी ‘न्यू इंडिया २०२२’ चे आश्वासन दिले. २०२४ च्या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांनी ‘फाइव्ह ट्रिलीन इकॉनॉमी’च्या दिशेने वाटचाल करण्याचे आश्वासन दिले. पण जे सांगितले ते १०० टक्के केंद्र सरकार करू शकलेले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकीसाठी पवार ठाण्यात आले होते. त्यांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आपले नाव पुढे येण्याची शक्यता असल्याकडे पवार यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘पंतप्रधानपदाची जबाबदार मी आता घेणार नाही. माझे वय आता ८२ वर्षे आहे. मोरारजी देसाई भाग्यवान होते. ते ८४ व्या वर्षी पंतप्रधान झाले. 

‘त्यांना’ आधीच कळते अनिल देशमुख, नवाब मलिक, खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवायांबाबत पवार यांनी नाराजी प्रकट केली. राज्यात कधी कुणावर छापा पडणार, कोण कधी तुरुंगात जाणार हे माहीत असणारा एक वर्ग सत्ताधारी पक्षात निर्माण झाला आहे.  त्यांना हे अगोदरच कसे कळते, असा प्रतिसवाल पवार यांनी रोहित पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर केला.

अत्याचारींची सुटका चिंताजनक गुजरातमधील बिल्कीस बानोवर बलात्कार करणाऱ्या आरोपींच्या मुक्ततेच्या निर्णयाबद्दल पवार म्हणाले की, खालच्या कोर्टापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुनावणी होऊन या खटल्यातील आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती, पण पंतप्रधान मोदी ज्या राज्यातून येतात तेथील त्यांच्या विचाराच्या सरकारने सर्व आरोपींची सुटका केली.  एवढेच नाही तर त्यांचा सत्कार केला. लाल किल्ल्यावरील १५ ऑगस्टच्या भाषणात पंतप्रधानांनी देशातील स्त्रियांच्या सन्मानाची भाषा केली आणि त्यांच्या राज्यातील सत्ताधाऱ्यांनी लाजिरवाण्या घटनेतील आरोपींचा सत्कार केला. हे विसंगत चित्र चिंताजनक आहे.

आझाद यांच्या पक्ष सोडण्याच्या कारणाबद्दल अनभिज्ञ देशातील भाजप सरकारच्या विरोधात समविचारी पक्षांना एकत्र करून जनमत एकत्र करण्याच्या काळात गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्ष सोडला हे चांगले झाले नाही. संसदेमधील ते माझे चांगले सहकारी आहेत. ते भाजपच्या भूमिकेविरोधात सतत आघाडीवर राहिले. पण पक्ष सोडून जाण्यासाठी त्यांच्यावर काय संकट आले ते माहीत नसल्याचे पवार म्हणाले.  

....हा तर संसदीय लोकशाहीवरील हल्ला  लोकशाही मार्गाने निवडून सत्ता मिळवता येत नसल्याचे पाहून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओरिसा आदी राज्यांतील बिगर भाजप सरकारमधील लोकांना फोडून, त्यांना आमिष दाखवून अथवा सीबीआय, ईडी आदी यंत्रणांचा वापर करून सत्ता उलथवून टाकली जात आहे.  हा संसदीय लोकशाहीवरील हल्ला आहे, अशी टीका पवार यांनी केली. गुजरात, आसाम या दोन राज्यांतील सत्ता वगळता भाजपला लोकांनी सत्तेवर येऊ दिले नाही, असेही ते म्हणाले.

....हा तर संसदीय लोकशाहीवरील हल्ला  लोकशाही मार्गाने निवडून सत्ता मिळवता येत नसल्याचे पाहून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओरिसा आदी राज्यांतील बिगर भाजप सरकारमधील लोकांना फोडून, त्यांना आमिष दाखवून अथवा सीबीआय, ईडी आदी यंत्रणांचा वापर करून सत्ता उलथवून टाकली जात आहे.  हा संसदीय लोकशाहीवरील हल्ला आहे, अशी टीका पवार यांनी केली. गुजरात, आसाम या दोन राज्यांतील सत्ता वगळता भाजपला लोकांनी सत्तेवर येऊ दिले नाही, असेही ते म्हणाले. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस