शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

जातीवाद, धर्माची सर्कस अजूनही संपलेली नाही : अरुंधती रॉय  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 7:44 PM

आरएसएस विरुद्ध सत्यशोधक रेझिस्टन्स ताकद उभी करावी लागेल..

पुणे : जातीवाद, धर्माची सर्कस अजून संपलेली नाही. आजही जाती, धर्माच्या दहशतीखाली सत्ता गाजवली जात आहे. आपल्याला एका संकुचित विचारसरणीत अडकवून ठेवले जात आहे. याविरोधात आपल्याला एकजुटीने लढा उभारावा लागेल. ही अस्तित्वाची लढाई आहे. आरएसएस विरुद्ध सत्यशोधक रेझिस्टन्स ताकद उभी करावी लागेल, असे आवाहन लेखिका आणि ब्लॉगर अरुंधती रॉय यांनी एल्गार परिषदेत केले. 

पुण्यात एल्गार परिषदेचे शनिवारी( दि. ३०) आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. रॉय म्हणाल्या,जात, पुरुषत्व, धर्म याबाबत सरकारच्या मनात खदखद आहे. त्यामुळे लव्ह जिहाद विरोधीसारखे शासन निर्णय मंजूर केले जात आहेत. मुस्लिमांची कत्तल हा त्यांचाच अपराध असे चित्र निर्माण केले जात आहे. तसेच एल्गार परिषद संविधानविरोधी काम करणारी नाही. शहरातील रस्त्यांवर दलितांवर खुलेआम अत्याचार, लोकांमध्ये नकारात्मकता पसरवणारे आपण नाही. एकविसाव्या शतकात संघ ब्राम्हणवादाचे नेतृत्व करत आहे. संसद त्यांच्या हातात आहे, ज्यांचे गोमूत्र हे आवडीचे औषध आहे. मोदींच्या रुपात दिल्लीच्या सत्तेवर बसले आहे. 

मोदी काँग्रेसच्या वंशवादावर बोलताना दमत नाहीत, मात्र अंबानी, अदानी यांच्यासारख्या कॉर्पोरेट क्षेत्रातील घराणेशाहीला सढळ हाताने मदत करतात हा विरोधाभास आहे. त्याचप्रमाणे भाजपा जगातील सर्वाधिक श्रीमंत राजकीय पक्ष हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली देशावर मालकी हक्क गाजवू पाहत आहेत. लपून वार करणे, दहशत निर्माण करणे, हुकूमशाही लादण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दात अरुंधती रॉय मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ब्राम्हणवाद, भांडवलशाही आणि पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात 'एल्गार' करण्याची गरजजात, पुरुषत्व, धर्म याबाबत सरकारच्या मनात खदखद आहे. त्यामुळे लव्ह जिहाद विरोधीसारखे शासन निर्णय मंजूर केले जात आहेत. मुस्लिमांची कत्तल हा त्यांचाच अपराध असे चित्र निर्माण केले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेElgar morchaएल्गार मोर्चाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी