शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

चिमुरडींच्या किंकाळीने हादरतोय पुरोगामी महाराष्ट्र...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 5:30 AM

पुरोगामी महाराष्ट्र चिमुरडींच्या किंकाळीने हादरत असल्याचे वास्तव एनसीआरबीच्या आकडेवारीतून उघड होत आहे. ३६ राज्यापैकी महाराष्ट्र राज्यात पहिल्या क्रमांकावर असून वर्षभरात ४८ चिमुरड्यांची हत्या करण्यात आल्याची नोंद आहे.

मुंबई : पुरोगामी महाराष्ट्र चिमुरडींच्या किंकाळीने हादरत असल्याचे वास्तव एनसीआरबीच्या आकडेवारीतून उघड होत आहे. ३६ राज्यापैकी महाराष्ट्र राज्यात पहिल्या क्रमांकावर असून वर्षभरात ४८ चिमुरड्यांची हत्या करण्यात आल्याची नोंद आहे. महिन्याला चार चिमुरड्यांची हत्या करण्यात होत असल्याची गंभीर बाब या अहवालातून समोर येत आहे.एनसीआरबीने जाहिर केलेल्या आकडेवारी नुसार, हत्याकांडात महाराष्ट्र तिसºया क्रमांकावर आहे. देशामध्ये ३० हजार ४५० हत्याकांडानी खळबळ उडवली. यामध्ये उत्तरप्रदेश आघाडीवर असून महाराष्ट्र तिसºया क्रमांकावर आहे. यात मन हेलावणारी बाब म्हणजे ६ वर्षाखालील चिमुकल्यांच्या हत्येत पहिल्या क्रमांकावर असलेल्या राज्यात चिमुरड्यांचा गळा घोटण्यात प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षभरात ९४ चिमुकल्यांची हत्या झाली. यामध्ये ४८ मुलींचा समावेश आहे. कुठेतरी आजही नकोशी म्हणून चिमुरड्यांची जन्मदाते किंवा नातेवाईकच हत्या करत आहेत. तर काही विकृत वासनेच्या बळी ठरत आहेत. कुठेतरी आजही मुलगी वाचवा बाबत जनजागती होणे गरजेचे आहे.राज्यामध्ये लहान मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या गुन्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात लैंगिक अत्याचाराचे ४ हजार ८१५ गुन्हे दाखल झाले आहेत. देशामध्ये लहान मुलांवर करण्यात आलेल्या अत्याचाराचे १ लाख ६ हजार ९५८ गुन्हे दाखल आहेत. यात राज्य दुसºया क्रमांकावर आहे. उत्तरप्रदेश मुलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात आघाडीवर असून मध्यप्रदेश तिसºया क्रमांकावर आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र