शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अखेर औरंगाबादला मिळाले पोलीस आयुक्त, चिरंजीव प्रसाद सांभाळणार धुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 15:59 IST

नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबादचे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

औरंगाबादनांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबादचेपोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या शहराच्या पोलीस आयुक्तपदी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती झाली आहे. मागील आठवड्यापासूनच त्यांच्या नियुक्तीवर सोशल मीडियात चर्चा सुरू होती. आज त्यांना नियुक्ती पत्र मिळाले. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचे परिस्थिती काहीशी बिघडत चालली होती. 11 मे रोजी औरंगाबादेत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला तात्काळ पोलीस आयुक्त द्या, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. अखेर मुख्यमंत्री आज चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबाद पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. 

मनपा आयुक्त मिळाले, पोलीस आयुक्त कधी ?

कचऱ्याच्या प्रश्नांवरून मिटमिटा येथे मार्च महिन्यात झालेल्या दंगलीनंतर तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविले होते. तेव्हापासून शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त म्हणून औरंगाबाद परिक्षेत्राचे महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे काम पाहत आहेत. अत्यंत संवेदनशील औरंगाबाद शहरात जानेवारीपासून आतापर्यंत चार दंगली झाल्या. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रस्त्यांवरील लुटमार, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरीसारख्या गुन्ह्यांत वाढ झाली. ‘मनपा आयुक्त मिळाले, पोलीस आयुक्त कधी’? या मथळ्याखाली लोकमतने १८ मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन शासनाने पोलीस आयुक्तपदी चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती केली. 

औरंगाबादमध्ये कामाचा आहे अनुभव प्रसाद हे १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  म्हणून त्यांनी २००२ मध्ये काम केले, नंतर त्यांची बदली जालना पोलीस अधीक्षकपदी, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, केंद्रीय पोलीस दलातही त्यांनी विशेष कामगिरी केली. बिहार आणि छत्तीसगडमध्ये राबविण्यात आलेल्या अ‍ॅन्टी नक्षल आॅपरेशनचे ते प्रमुख होते. दोन वर्षांपासून ते नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी कार्यरत होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस