शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 08:04 IST

शक्तिशाली बंडखोरांशी मुख्यमंत्री बोलले; पक्षांतर्गत नाराजी रोखण्यासाठी केेल्या सूचना; असंतोषाने वाढविली डोकेदुखी

यदु जोशी -

मुंबई : महापालिका निवडणुकीत भाजपची डोकेदुखी बंडखोरांनी अनेक ठिकाणी वाढविली असल्याचे चित्र असताना बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपासून पुढाकार घेतला आहे. असंतुष्टांची मोठी संख्या असलेल्या शहरांमधील प्रमुख नेत्यांना त्यांनी फोन केले व बंडाळी थांबविण्यास सांगितले. काही शक्तिशाली बंडखोरांशी ते स्वत: बोलल्याची माहिती आहे. 

कोणकोणत्या बंडखोरांमुळे मोठा फटका बसू शकतो याची माहिती फडणवीस यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी फोन सुरू केले. पक्षाचे स्थानिक नेते, आमदार, खासदार आणि विभागीय संघटन मंत्री यांच्याशी चर्चा केली आणि पक्षांतर्गत नाराजी कशी रोखता येईल, याबाबत काही सूचनादेखील केल्या.  

दिलेला शब्द : पक्षनिष्ठा वाया जाणार नाहीमहापालिकेत उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक असताना एकालाच उमेदवारी देणे शक्य होते, पण तुमची पक्षनिष्ठा वाया जाणार नाही, नजीकच्या भविष्यात त्याची नक्कीच दखल घेतली जाईल, असा शब्द माझ्याकडून द्या, असे मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांना सांगितले.

उमेदवारी डावलेल्यांना महापालिकेत स्वीकृत सदस्य, जिल्हा, विभागीय वा राज्यस्तरीय शासकीय समित्यांवर काम करण्याची संधी, विविध महामंडळांवर संधी दिली जाईल किंवा पक्षसंघटनेत पदे दिली जातील, अशी ऑफर देण्यात आली आहे. 

निष्ठावंत कार्यकर्त्यांची काढली विशेष समजूत फडणवीस यांनी बंडखोरांना समजविण्यासाठी स्वत: काही फोन विविध शहरांमध्ये केले. जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांची त्यांनी विशेषत: समजूत काढली. सरकार आपले आहे, महापालिकांमध्येही आपलीच सत्ता येणार आहे. आज न्याय मिळाला नाही, पण भविष्यात तो नक्कीच देता येईल, असे त्यांनी सांगितले. 

छत्रपती संभाजीनगर, नाशिक ठरले हॉटस्पॉटभाजपअंतर्गत सर्वाधिक बंडखोरी आणि असंतोष हा छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये बघायला मिळत आहे. मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याविरुद्धचा रोष डावललेले इच्छुक मांडत आहेत. नाशिकही बंडखोरीचा हॉटस्पॉट बनला आहे. मंत्री गिरीश महाजन संकटाचे केंद्रबिंदू बनले आहेत.

नाराजांना शांत करण्याची जबाबदारी या नेत्यांवरनाराजांना शांत करण्यासाठीची जबाबदारी विविध नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री आणि प्रमुख भाजप नेत्यांविरुद्ध तिकिटे कापल्याने संताप आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी न देता मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूत्रे स्वत:कडे घेतली आहेत.

एका निष्ठावंताला डावलून दुसऱ्याला तिकीट दिले तिथे तेवढी नाराजी नाही, पण कालपरवा पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली अन् वर्षानुवर्षांच्या निष्ठावंतांना डावलले अशा ठिकाणी असंतोष प्रचंड आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : CM Intervenes to Quell BJP Rebellion in Maharashtra Local Elections

Web Summary : Amidst rising rebellion in local elections, CM Fadnavis intervened, calling key leaders to pacify dissent. He assured party workers their loyalty wouldn't be ignored, promising future opportunities in government bodies and party positions. Nashik and Chhatrapati Sambhajinagar are hotspots of discontent.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस