शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मुख्यमंत्री उंटावरून शेळ्या हाकतात, नाना पटोले यांची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 20:59 IST

यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी रासायनिक खताच्या फवा-याने शेतकरी मृत्युमुखी पडले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाकडे पाठ फिरविली आहे.

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी रासायनिक खताच्या फवा-याने शेतकरी मृत्युमुखी पडले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाकडे पाठ फिरविली आहे. ड्राय पोर्टच्या उद्घाटनाला त्यांना वर्धेला येणे जमते, मात्र यवतमाळला येऊन पीडितांची भेट घेण्याचे सौजन्य त्यांनी दाखविले नाही. मुंबईत बसून त्यांना विदर्भाची खडान्खडा माहिती असतानादेखील झालेल्या प्रकाराबाबत त्यांची उदासिनता हा उंटावरून शेळ्या हाकण्याचाच प्रकार असल्याची जहरी टीका गोंदिया-भंडारा येथील भाजपा खासदार नाना पटोले यांनी केली आहे. नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते.सुरुवातीला जेव्हा मृत्यूच्या घटना उघडकीस आल्या त्यावेळीच जर राज्य शासनाने पावले उचलली असती, तर पुढील नुकसान टाळता आले असते. मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे झालेले मृत्यू हे एकाप्रकारे हत्याकांडच आहे, असा आरोप पटोले यांनी लावला. मुख्यमंत्री संवेदनशील असल्याचा दावा सत्ताधारी करतात. मग शेतक-यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश त्यांना दिसला नाही का असा प्रश्न उपस्थित करत पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. घटना झाल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील नेत्यांची भेट घेऊन पीडित कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित होते. मात्र विदर्भातील माणूस मुंबईला गेला की तो बदलतो, असेदेखील पटोले म्हणाले.श्रेय लाटण्याचा असाही अट्टाहासदरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील २० शेतक-यांच्या मृत्यूची दखल घेत केंद्र शासनाच्या अखत्यारितील डिपार्टमेन्ट आॅफ प्लँट प्रोटेक्शनच्या चमूने सोमवारी तेथे भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी लिहिलेले पत्र व केंद्रीय कृषिमंत्र्यांशी घेतलेली भेट यामुळेच ही समिती येथे आली, असा दावा नाना पटोले यांनी केला. पटोले यांनी ५ आॅक्टोबर रोजी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. मात्र केवळ त्यांनी लिहिलेल्या पत्रामुळेच पथक येथे आले, हा त्यांचा दावा अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे.

टॅग्स :BJPभाजपाNana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस