शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
4
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
5
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
6
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
7
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
8
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
9
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
10
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
11
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
12
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
13
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
14
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
15
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
16
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
17
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
18
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
19
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
20
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...

मुख्यमंत्री उंटावरून शेळ्या हाकतात, नाना पटोले यांची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 20:59 IST

यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी रासायनिक खताच्या फवा-याने शेतकरी मृत्युमुखी पडले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाकडे पाठ फिरविली आहे.

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी रासायनिक खताच्या फवा-याने शेतकरी मृत्युमुखी पडले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाकडे पाठ फिरविली आहे. ड्राय पोर्टच्या उद्घाटनाला त्यांना वर्धेला येणे जमते, मात्र यवतमाळला येऊन पीडितांची भेट घेण्याचे सौजन्य त्यांनी दाखविले नाही. मुंबईत बसून त्यांना विदर्भाची खडान्खडा माहिती असतानादेखील झालेल्या प्रकाराबाबत त्यांची उदासिनता हा उंटावरून शेळ्या हाकण्याचाच प्रकार असल्याची जहरी टीका गोंदिया-भंडारा येथील भाजपा खासदार नाना पटोले यांनी केली आहे. नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते.सुरुवातीला जेव्हा मृत्यूच्या घटना उघडकीस आल्या त्यावेळीच जर राज्य शासनाने पावले उचलली असती, तर पुढील नुकसान टाळता आले असते. मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे झालेले मृत्यू हे एकाप्रकारे हत्याकांडच आहे, असा आरोप पटोले यांनी लावला. मुख्यमंत्री संवेदनशील असल्याचा दावा सत्ताधारी करतात. मग शेतक-यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश त्यांना दिसला नाही का असा प्रश्न उपस्थित करत पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. घटना झाल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील नेत्यांची भेट घेऊन पीडित कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित होते. मात्र विदर्भातील माणूस मुंबईला गेला की तो बदलतो, असेदेखील पटोले म्हणाले.श्रेय लाटण्याचा असाही अट्टाहासदरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील २० शेतक-यांच्या मृत्यूची दखल घेत केंद्र शासनाच्या अखत्यारितील डिपार्टमेन्ट आॅफ प्लँट प्रोटेक्शनच्या चमूने सोमवारी तेथे भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी लिहिलेले पत्र व केंद्रीय कृषिमंत्र्यांशी घेतलेली भेट यामुळेच ही समिती येथे आली, असा दावा नाना पटोले यांनी केला. पटोले यांनी ५ आॅक्टोबर रोजी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. मात्र केवळ त्यांनी लिहिलेल्या पत्रामुळेच पथक येथे आले, हा त्यांचा दावा अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे.

टॅग्स :BJPभाजपाNana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस