शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री उंटावरून शेळ्या हाकतात, नाना पटोले यांची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 20:59 IST

यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी रासायनिक खताच्या फवा-याने शेतकरी मृत्युमुखी पडले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाकडे पाठ फिरविली आहे.

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी रासायनिक खताच्या फवा-याने शेतकरी मृत्युमुखी पडले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाकडे पाठ फिरविली आहे. ड्राय पोर्टच्या उद्घाटनाला त्यांना वर्धेला येणे जमते, मात्र यवतमाळला येऊन पीडितांची भेट घेण्याचे सौजन्य त्यांनी दाखविले नाही. मुंबईत बसून त्यांना विदर्भाची खडान्खडा माहिती असतानादेखील झालेल्या प्रकाराबाबत त्यांची उदासिनता हा उंटावरून शेळ्या हाकण्याचाच प्रकार असल्याची जहरी टीका गोंदिया-भंडारा येथील भाजपा खासदार नाना पटोले यांनी केली आहे. नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते.सुरुवातीला जेव्हा मृत्यूच्या घटना उघडकीस आल्या त्यावेळीच जर राज्य शासनाने पावले उचलली असती, तर पुढील नुकसान टाळता आले असते. मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे झालेले मृत्यू हे एकाप्रकारे हत्याकांडच आहे, असा आरोप पटोले यांनी लावला. मुख्यमंत्री संवेदनशील असल्याचा दावा सत्ताधारी करतात. मग शेतक-यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश त्यांना दिसला नाही का असा प्रश्न उपस्थित करत पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. घटना झाल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील नेत्यांची भेट घेऊन पीडित कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित होते. मात्र विदर्भातील माणूस मुंबईला गेला की तो बदलतो, असेदेखील पटोले म्हणाले.श्रेय लाटण्याचा असाही अट्टाहासदरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील २० शेतक-यांच्या मृत्यूची दखल घेत केंद्र शासनाच्या अखत्यारितील डिपार्टमेन्ट आॅफ प्लँट प्रोटेक्शनच्या चमूने सोमवारी तेथे भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी लिहिलेले पत्र व केंद्रीय कृषिमंत्र्यांशी घेतलेली भेट यामुळेच ही समिती येथे आली, असा दावा नाना पटोले यांनी केला. पटोले यांनी ५ आॅक्टोबर रोजी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. मात्र केवळ त्यांनी लिहिलेल्या पत्रामुळेच पथक येथे आले, हा त्यांचा दावा अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे.

टॅग्स :BJPभाजपाNana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस