शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘ज्या वृत्तीविरोधात शाहू महाराजांनी संघर्ष केला ती संपवणे गरजेचे’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 14:37 IST

Uddhav thackeray: शाहू महाराज हे दीनदुबळ्यांसाठी संघर्ष करणारे नेते होते, असे गौरवोद्गार उद्धव ठाकरेंनी काढले. तसेच शाहू महाराजांनी ज्या वृत्तीविरोधात संघर्ष केले ती संपवणे गरजेचे आहे, असे महत्त्वपूर्ण विधानही मुख्यमंत्र्यांनी केले.

 मुंबई - कोल्हापूरसहमहाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या १००व्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही शाहू महाराजांना आदरांजली वाहताना त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. यावेळी शाहू महाराज हे दीनदुबळ्यांसाठी संघर्ष करणारे नेते होते, असे गौरवोद्गार उद्धव ठाकरेंनी काढले. तसेच शाहू महाराजांनी ज्या वृत्तीविरोधात संघर्ष केले ती संपवणे गरजेचे आहे, असे महत्त्वपूर्ण विधानही मुख्यमंत्र्यांनी केले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, जगात अनेक राजे होऊन गेले. त्यातील अनेकांची नावंही आपल्याला आठवत नाहीत. काही राजे नुसतेच गादीवर बसले. मात्र शाहू महाराज हे केवळ गादीवर बसणारे राजे नव्हते. ते कधी गादीवर आरामात बसून राहिले नाही. शाहू महाराज हे दीननदुबळ्यांसाठी संघर्ष करणारे राजे होते. त्यांनी अस्पृश्यांना माणसासारखे वागवावे, यासाठी संघर्ष केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी शाहू महाराजांबाबत सांगितलेल्या आठवणींनाही उजाळा दिला.

शाहू महाराज समाजतील चुकीच्या वृत्तींविरोधात कामच लढले. आज जातीपातींमध्ये फार असमानता राहिलेली नाही. जिकडे आहे तिथूनही ती संपुष्टात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण ज्या वृत्तीविरोधात शाहू महाराज लढले, ती वृत्ती आज खरोखरच संपली आहे का, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. या वृत्तीने शाहू महाराजांना का छळलं तर त्याचं कारण म्हणजे ते गरीब, दीनदुबळ्यांना मदत करत होते. त्यामुळे आज आपण आपले राजे ज्या वृत्तीविरोधात लढले ती प्रवृत्ती जिथे जिवंत आहे, तिथून संपवण्याची प्रतिज्ञा करूया. तसेच शिवछत्रपतींचं, शाहू महाराजांना अपेक्षित असलेला समाज  आणि राज्य निर्माण करण्याचा संकल्प करूया,  असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेkolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र