शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुख्यमंत्री ठाकरे सगळ्यांना सोबत घेऊन जात आहेत- बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 4:10 AM

नवे घर लावताना सुरुवातीला काही काळ भांड्याला भांडे लागतेच. याचा अर्थ लगेच तीन पक्षात वाद आहेत असा होत नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्याशी झालेली ही बातचित.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळ्यांना सोबत घेऊन काम करत आहेत. विषय समजून ते त्यावर भाष्य करतात. प्रशासनाच्या कामात ते कुठेही नवखे आहेत असे वाटत नाही. नवीन सरकार आहे, नवे घर लावताना सुरुवातीला काही काळ भांड्याला भांडे लागतेच. याचा अर्थ लगेच तीन पक्षात वाद आहेत असा होत नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्याशी झालेली ही बातचित.हे सरकार पाच वर्षे टिकणार हे तुम्ही कशाच्या भरवश्यावर म्हणता?याच १०० दिवसात आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समित्या, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका एकत्र लढलो आणि सगळ्या ठिकाणी भाजपचा दारुण पराभव झाला. एवढे एकच उदाहरण हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल यासाठी पुरेसे बोलके आहे. भाजप आता सत्ता नसल्याने अस्वस्थ आहे. त्यांना काही काम उरले नाही, त्यामुळे ते सतत आमच्यात विसंवाद असल्याच्या बातम्या पेरण्याचे काम करत आहे.या सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. या काळात तुम्हाला जे अपेक्षित होते ते पूर्ण होत आहे का?आम्ही विरोधी पक्षनेता ही बनवू शकणार नाहीत अशी भाषा भाजपची होती. त्यातून आम्ही सत्तेत आलो, १०० दिवस पूर्ण केले, त्यामुळे खरे तर हा प्रश्न आता विरोधांना विचारला पाहिजे. राहता राहीला आमचा विषय, तर आम्ही किमान समान कार्यक्रमानुसार काम करतोय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेऊन तो अंमलातही आणला आहे, एवढ्या वेगाने तर भाजपने जाहीर केलेली कर्जमाफीही अंमलात आली नव्हती. ही तर सुरुवात आहे.काँग्रेस व राष्ट्रवादीचे मंत्री वेगवेगळी विधाने करतात, त्यावर शिवसेना नेते म्हणून तुमची प्रतिक्रिया काय असते?हे तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे सगळ्या नेत्यांनी जबाबदारीने विधाने केली पाहिजेत. वादाचे विषय टाळले पाहिजेत. स्वत:ला श्रेय मिळवण्यापेक्षा सरकारला यश कसे मिळेल हे पाहिले पाहिजे. सरकार चांगले चालणे हे सगळ्यांचे प्राधान्य असावे. श्रेयवाद करु नये. श्रध्दा आणि सबुरी यावर विश्वास ठेवला पाहिजे. हा सल्ला आमच्याच पक्षातल्या नाही तर तीनही पक्षाच्या नेत्यांना आहे आणि सगळेच समंजस नेते असल्याने वाद नाहीत.शिवसेनेसोबत आपण सत्तेत येऊ असे कधी वाटले होते का? विरोधात असतानाचा व आता सत्तेत असणारी शिवसेना यावर काय सांगाल?शिवसेना म्हणजे भाजप नाही हे आम्हाला चांगले माहिती आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्व. इंदिरा गांधी यांना समर्थन दिले होते. राष्टÑपतीपदाच्या वेळीही त्यांनी काँग्रेसला साथ दिली होती. आता त्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी आम्ही साथ दिली आहे. उध्दव ठाकरे अत्यंत ‘पॉझिटिव्ह’ आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा त्यांचा सतत आग्रह दिसून येतो. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना ते भेटून आले. शिवसेनेसोबत काम करताना आम्हाला खूप चांगला अनूभव येत आहे.राष्टÑवादी पक्ष सरकारमध्ये वरचढ आणि काँग्रेस दुय्यमस्थानी आहे असे वाटते का?त्यांच्याकडे मोठी टीम होती. आमच्याकडे मी, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार असे मोजकेच लोक राज्यभर फिरत होतो. सरकारच येणार नाही असे म्हणत असताना आम्ही सत्तेवर आलो. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते सरकारसाठी मोठी भूमिका बजावत आहेत. त्यामुळे आमच्यात कोणतेही वाद नाहीत.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरात