शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

...आता बोलणारे तेव्हा काय करत होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 09:41 IST

गेल्या अडीच वर्षात कुणाच्या दादागिरीमुळे, त्रासामुळे, मानसिक छळामुळे किती उद्योग भरडले गेले, बाहेर गेले याचा हिशोब आमच्याकडे आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. 

नवी दिल्ली - मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला तेव्हा आता बोलणारे काय करत होते? मराठी टक्का कुणामुळे कमी झाला? मराठी माणसाला बदलापूर, ठाणे, अंबरनाथ, वसई विरारला जायला भाग पाडलं त्याला जबाबदार कोण? फक्त मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं. त्यामुळे आगामी निवडणुकीत मुंबईकर जनता यांना धडा शिकवतील असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या २५ वर्षात मुंबईकरांना काय त्रास सहन करावा हे सगळ्यांना माहिती आहे. जनतेच्या हातात सगळं काही आहे. कुणाला हरवायचं कुणाला जिंकवायचं हे लोकांना माहिती आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शहरातील खड्डे समस्या दूर करण्यासाठी आयुक्तांची बैठक घेतली. साडे पाच हजार कोटींचे टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली. आरोग्य केंद्र, सुशोभिकरण ही कामे मार्गी लावली जात आहे. त्यामुळे निवडणुकीत जनता योग्य त्याला मतदान करेल असा विश्वास आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमचं सरकार येऊन २ महिने झाले. गेल्या २ वर्षापासून वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात करण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु तत्कालीन सरकारने सकारात्मक पुढाकार घेतला नाही. परंतु आमच्या सरकारनं प्रयत्न केल्यामुळे सलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याचं वेदांताने जाहीर केले. गेल्या अडीच वर्षात कुणाच्या दादागिरीमुळे, त्रासामुळे, मानसिक छळामुळे किती उद्योग भरडले गेले, बाहेर गेले याचा हिशोब आमच्याकडे आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. 

त्यांच्या खोक्याचा हिशोब माझ्याकडे सूड भावनेने, आकसापोटी उद्धव ठाकरे टीका करत आहेत. आज देश महासत्तेकडे चालला आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदींवर बोलणे याला जनता उत्तर देईल. दसरा मेळाव्यासाठी स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी परवानगी मागितली आहे. आम्ही बाळासाहेबांच्या हिदुत्ववादाचे खरे वारसदार आहोत. त्यांच्या खोक्याचा हिशोब माझ्याकडे आहे. योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ. ५० आमदार, १२ खासदार एवढा मोठा निर्णय होत नाही. बोलायला ठीक आहे. त्यांच्याकडे आरोप करण्याशिवाय काहीच शिल्लक नाही असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे