शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

...आता बोलणारे तेव्हा काय करत होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 09:41 IST

गेल्या अडीच वर्षात कुणाच्या दादागिरीमुळे, त्रासामुळे, मानसिक छळामुळे किती उद्योग भरडले गेले, बाहेर गेले याचा हिशोब आमच्याकडे आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. 

नवी दिल्ली - मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला तेव्हा आता बोलणारे काय करत होते? मराठी टक्का कुणामुळे कमी झाला? मराठी माणसाला बदलापूर, ठाणे, अंबरनाथ, वसई विरारला जायला भाग पाडलं त्याला जबाबदार कोण? फक्त मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं. त्यामुळे आगामी निवडणुकीत मुंबईकर जनता यांना धडा शिकवतील असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या २५ वर्षात मुंबईकरांना काय त्रास सहन करावा हे सगळ्यांना माहिती आहे. जनतेच्या हातात सगळं काही आहे. कुणाला हरवायचं कुणाला जिंकवायचं हे लोकांना माहिती आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शहरातील खड्डे समस्या दूर करण्यासाठी आयुक्तांची बैठक घेतली. साडे पाच हजार कोटींचे टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली. आरोग्य केंद्र, सुशोभिकरण ही कामे मार्गी लावली जात आहे. त्यामुळे निवडणुकीत जनता योग्य त्याला मतदान करेल असा विश्वास आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमचं सरकार येऊन २ महिने झाले. गेल्या २ वर्षापासून वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात करण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु तत्कालीन सरकारने सकारात्मक पुढाकार घेतला नाही. परंतु आमच्या सरकारनं प्रयत्न केल्यामुळे सलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याचं वेदांताने जाहीर केले. गेल्या अडीच वर्षात कुणाच्या दादागिरीमुळे, त्रासामुळे, मानसिक छळामुळे किती उद्योग भरडले गेले, बाहेर गेले याचा हिशोब आमच्याकडे आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. 

त्यांच्या खोक्याचा हिशोब माझ्याकडे सूड भावनेने, आकसापोटी उद्धव ठाकरे टीका करत आहेत. आज देश महासत्तेकडे चालला आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदींवर बोलणे याला जनता उत्तर देईल. दसरा मेळाव्यासाठी स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी परवानगी मागितली आहे. आम्ही बाळासाहेबांच्या हिदुत्ववादाचे खरे वारसदार आहोत. त्यांच्या खोक्याचा हिशोब माझ्याकडे आहे. योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ. ५० आमदार, १२ खासदार एवढा मोठा निर्णय होत नाही. बोलायला ठीक आहे. त्यांच्याकडे आरोप करण्याशिवाय काहीच शिल्लक नाही असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे