शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

...म्हणून दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरावं लागतंय; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 14:17 IST

जयदीप आपटेची अटक ही विरोधकांना चपराक आहे. मालवण प्रकरणी सरकार कुणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.  

मुंबई - बाळासाहेबांचे विचार सोडल्याने आज उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरावं लागतंय असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. त्याशिवाय मालवण प्रकरणी राजकारण करणं दुर्दैवी आहे. सातत्याने आरोप करणाऱ्या संजय राऊतांनी ठाण्यातील एका रुग्णालयात दाखल व्हावं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुंबईत पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, मालवण प्रकरणी कुणालाही सरकार सोडणार नाही. दोषींना कठोर शिक्षा होईल. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबाबत श्रद्धा, झालेली घटना दुर्दैवी आहे आणि त्यावर राजकारण करणे त्याहून दु्र्दैवी आहे. जयदीप आपटे असो वा अन्य कुणीही कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. तो कुठेही असेल त्याला पकडू असं मी म्हटलं होते आणि आता त्याला पकडलंय असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय विरोधक जे राजकारण करत होते त्यांना जयदीप आपटे अटकेनंतर चपराक मिळाली आहे. जयदीप आपटेची चौकशी होऊन कारवाई होईल. ही घटना दुर्दैवी होती मात्र त्यावर विरोधकांनी राजकारण केले. सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा लवकरात लवकर पुन्हा तिथे उभारेल हे आमचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितले. यावेळी संजय राऊतांवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांना ठाण्यातील एका रुग्णालयात उपचाराची गरज आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला. 

दरम्यान, जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा दिल्लीहून नेते इथं यायचे आता उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या गल्लीगल्लीत जावं लागतंय, मला मुख्यमंत्री करा असं सांगावे लागतेय हे पाहून बाळासाहेबांनाही दु:ख होत असेल. बाळासाहेबांचा विचार सोडल्यानंतर अशी परिस्थिती झाली आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार, आनंद दिघेंचा विचार घेऊन पुढे जातोय. राज्याचा विकास करतोय. राज्यात कल्याणकारी योजनाही आणत आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊतmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४