शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याने आमदार पाटणींची चिंता मिटली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 12:03 PM

शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितल्याने कारंजाची जागा पुन्हा भाजपकडेच राहणार असल्याचे निश्चित समजले जात आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाचा पेच कायम आहे. भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी नेतृत्व करित असलेल्या कारंजा लाड विधानसभा मतदारसंघावर यावेळी शिवसेनेने दावा केला आहे. मात्र महायुतीच्या जागावाटपात सेना-भाजपच्या सिटींग जागा ज्यांच्या त्यांच्याजवळ राहणार असल्याचा खुलासा शनिवारी झालेल्या पत्रकार परिषेदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने आमदार पाटणींचा मार्ग मोकळा झाला आहे. तर शिवसेना दावा करत असलेला कारंजा विधानसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा व शिवसेनेत युती न झाल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले आणि भाजपचे राजेंद्र पाटणी हे ४ हजार १४७ मतांनी विजयी झाले होते. मात्र जुन्या युतीच्या फॉर्म्युलानुसार हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. आता पुन्हा युती होणार असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत कारंजाची जागा सेनेला सोडण्याची मागणी होती आहे. दुसरीकडे मात्र गत निवडणुकीत भाजपाचा उमेदवार निवडून आल्याने व यावेळीही भाजपाकडून या मतदारसंघावर दावा केला जात असल्याने या मतदार संघात मोठा पेच निर्माण झाला होता.

शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितल्याने कारंजाची जागा पुन्हा भाजपकडेच राहणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर विद्यामान आमदार पाटणींचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा मतदारसंघात पहायला मिळत आहे. महायुती म्हणून निवडणूक लढताना सुरवातीला इतर मित्र पक्षांच्या जागा निश्चित केल्या जाणार असून, उर्वरित जागांचे फिफ्टी-फिफ्टी वाटप करताना, सिटींग जागा ज्यांच्या त्यांच्याजवळ राहणार असल्याचा खुलासा मुख्यमंत्री यांनी केला आहे. तर एखादी दुसरी जागा अदलाबदल करायची झाल्यास त्यावर चर्चा केली जाणार असल्याचे सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले. 

खासदार भावना गवळी यांनी माजी आमदार प्रकाश डहाके यांचा विधानसभेत उमेदवारी देण्याच्या आश्वासन देत शिवसेनेत प्रवेश करून घेतला होता. मात्र आता युतीच्या नवीन फॉर्म्युलानुसार विद्यमान आमदार असलेल्या जागा ज्यांच्या त्यांच्याजवळ राहणार असल्याने कारंजाची जागा भाजपच्या वाट्याला जात आहे. त्यामुळे डहाके हे आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.