शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंकडून टाळाटाळ, पण फडणवीसांकडून 'तो' निर्वाणीचा इशारा; राजीनाम्याची 'इनसाईड स्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 20:30 IST

हत्येच्या घटनेशी माझा काहीही संबंध नसल्याचं सांगत धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी वारंवार धुडकावून लावत होते.

CM Devendra Fadnavis: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. स्वीय सहाय्यकाच्या मार्फत मुंडे यांनी हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवल्याचे समजते. मी माझ्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणास्तव हा निर्णय घेत असल्याचं धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातून सांगितलं. मात्र या राजीनाम्यामागे वेगळीच कहाणी असल्याची बाब आता समोर आली आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल ८० दिवस होऊन गेले आहेत. हत्या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच या घटनेमागे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराड याचा सहभाग असल्याचा आरोप होत होता. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी मंत्रिमंडळातून बाहेर राहावं, अशी मागणी विविध स्तरातून होत होती. परंतु हत्येच्या घटनेशी माझा काहीही संबंध नसल्याचं सांगत धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी धुडकावून लावत होते. त्यामुळे आता असं नेमकं काय घडलं की त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्र्‍यांची कडक भूमिका आणि निर्णय झाला!

भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विधिमंडळात आवाज उठवल्यानंतर आरोपी कोणीही असो, त्याला शिक्षा तर होणारच, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली होती. तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा, असं मुख्यमंत्र्‍यांचे मत असल्याचे सांगितले जात आहे.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी याआधी तीन ते चार वेळा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा केली होती. परंतु धनंजय मुंडे मात्र राजीनामा देण्यास तयार नव्हते. अशा स्थितीत नुकतेच सीआयडीकडून देशमुख प्रकरणातील आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आले. वाल्मीक कराड हाच हत्येमधील मुख्य सूत्रधार असल्याचे आरोपपत्रातून स्पष्ट झालं. त्यातच देशमुख यांना केलेली अमानुष मारहाण आणि त्यांच्या मृत शरीराची केलेली विटंबना दाखवणारे आरोपपत्रातील फोटो समाजमाध्यमांत प्रसिद्ध झाल्याने जनआक्रोश वाढला. 

दरम्यान, राज्यभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली. तुम्ही राजीनाम्याचा निर्णय न घेतल्यास मला तुमची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्‍यांनी या बैठकीत धनंजय मुंडे यांना दिल्याचं समजते. त्यानंतर अखेर मुंडे यांनी आज राजीनामा दिला. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.

राजीनाम्यामागे धनंजय मुंडेंनी कोणतं कारण सांगितलं.

राजीनाम्याची माहिती देताना धनंजय मुंडे म्हणाले की, "बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे," असं मुंडे यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण