शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

धनंजय मुंडेंकडून टाळाटाळ, पण फडणवीसांकडून 'तो' निर्वाणीचा इशारा; राजीनाम्याची 'इनसाईड स्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 20:30 IST

हत्येच्या घटनेशी माझा काहीही संबंध नसल्याचं सांगत धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी वारंवार धुडकावून लावत होते.

CM Devendra Fadnavis: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. स्वीय सहाय्यकाच्या मार्फत मुंडे यांनी हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवल्याचे समजते. मी माझ्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणास्तव हा निर्णय घेत असल्याचं धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातून सांगितलं. मात्र या राजीनाम्यामागे वेगळीच कहाणी असल्याची बाब आता समोर आली आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल ८० दिवस होऊन गेले आहेत. हत्या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच या घटनेमागे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराड याचा सहभाग असल्याचा आरोप होत होता. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी मंत्रिमंडळातून बाहेर राहावं, अशी मागणी विविध स्तरातून होत होती. परंतु हत्येच्या घटनेशी माझा काहीही संबंध नसल्याचं सांगत धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी धुडकावून लावत होते. त्यामुळे आता असं नेमकं काय घडलं की त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्र्‍यांची कडक भूमिका आणि निर्णय झाला!

भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विधिमंडळात आवाज उठवल्यानंतर आरोपी कोणीही असो, त्याला शिक्षा तर होणारच, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली होती. तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा, असं मुख्यमंत्र्‍यांचे मत असल्याचे सांगितले जात आहे.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी याआधी तीन ते चार वेळा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा केली होती. परंतु धनंजय मुंडे मात्र राजीनामा देण्यास तयार नव्हते. अशा स्थितीत नुकतेच सीआयडीकडून देशमुख प्रकरणातील आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आले. वाल्मीक कराड हाच हत्येमधील मुख्य सूत्रधार असल्याचे आरोपपत्रातून स्पष्ट झालं. त्यातच देशमुख यांना केलेली अमानुष मारहाण आणि त्यांच्या मृत शरीराची केलेली विटंबना दाखवणारे आरोपपत्रातील फोटो समाजमाध्यमांत प्रसिद्ध झाल्याने जनआक्रोश वाढला. 

दरम्यान, राज्यभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली. तुम्ही राजीनाम्याचा निर्णय न घेतल्यास मला तुमची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्‍यांनी या बैठकीत धनंजय मुंडे यांना दिल्याचं समजते. त्यानंतर अखेर मुंडे यांनी आज राजीनामा दिला. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.

राजीनाम्यामागे धनंजय मुंडेंनी कोणतं कारण सांगितलं.

राजीनाम्याची माहिती देताना धनंजय मुंडे म्हणाले की, "बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे," असं मुंडे यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण