शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मुख्यमंत्री फडणवीस काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याच्या प्रयत्नात, अशोक चव्हाण यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 16:33 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण परभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फुटीची चिन्हे दिसू लागली असून, विविध राज्यांमध्ये अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. दरम्यान....

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण परभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फुटीची चिन्हे दिसू लागली असून, विविध राज्यांमध्ये अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत, दरम्यान, महाराष्ट्रातही काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले आहे. मात्र स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस आमदारांना आणि नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्यासोबत कोण जाईल असे वाटत नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये सध्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी बैठका सुरू आहेत. याबाबत अशोक चव्हाण यांनी सांगितले की, ‘पराभवाची समीक्षा करण्यासाठी मित्रपक्षांशी बोलण्याआधी पक्षातील लोकांची भूमिका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी जिल्हानिहाय बैठक घेतली आहे. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला आहे, अशा ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत,’ दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मित्रपक्षांशी चर्चा करण्यापूर्वी पक्षातील कार्यकर्त्यांशी  चर्चा करत आहोत. असेही चव्हाण यांनी सांगितले.  काँग्रेसने घेतलेल्या या बैठकीत स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात सूर लावला. आघाडी झाली तरी राष्ट्रवादीचे लोक खाली मतदारसंघात काँग्रेसला मदत करत नाहीत. उलट राष्ट्रवादीचे लोक भाजपला मदत करतात. त्यामुळे राष्ट्रवाडीबरोबर आघाडी नको, असा सूर बैठकीत उमटला. त्याऐवजी वंचित बहुजन बरोबर आघाडी करावी अशीही भूमिका मांडण्यात आली.यावेळी अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांनी संघाबाबत केलेल्या वक्तव्यावर टिप्पणी करणे टाळले. संघाचे सर्वच काही घेण्यासारखे नाही, उदाहरण देण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत. आम्ही संघाचं अनुकरण करणार नाही. पण चिकाटीने काम करून, असेही  चव्हाण यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा