शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

झारखंडमध्ये २ तर महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक का? राजीव कुमार म्हणाले, "गेल्यावेळी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 16:40 IST

ख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी झारखंडमध्ये दोन टप्प्यात आणि महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणुका घेण्याचे कारण सांगितले आहे.

Maharashtra, Jharkhand Election Phase : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात आणि झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. तर झारखंडमध्ये १३ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे. महाराष्ट्रासोबतच झारखंडच्या निवडणुकीचा निकालही २३ नोव्हेंबरला लागणार आहे. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी झारखंडमध्ये दोन टप्प्यात आणि महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणुका घेण्याचे कारण सांगितले आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे, तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी ५ जानेवारीला संपणार आहे. त्याआधी दोन्ही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र यावेळी पत्रकारांनी राजीव कुमार यांना झारखंडमध्ये दोन टप्प्यात आणि महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणुका घेण्याबाबत विचारले. तसेच यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या मागणीबाबतही प्रश्न विचारला. त्यावेळी बोलताना राजीव कुमार यांनी याबाबत भाष्य केलं.

काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राजीव कुमार हे मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन  त्यांच्या सूचना जाणून घेतल्या होत्या. यावेळी राज्यातील आगामी विधानसभा निवडणूका एकाच टप्प्यात घ्याव्यात, अशी मागणी महायुतीतील शिंदेसेना आणि अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली. कमी टप्प्यात मतदान घ्या, अशी उद्धव सेनेसुद्धा मागणी केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील निवडणूक एका टप्प्यात तर झारखंडमधील निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे.

"तुम्हाला माहिती आहे का गेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंडमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं. झारखंड बद्दल काही गोष्टी आहेत. तिथे नक्षलींची समस्या असल्याने तिथे दोन टप्प्यात निवडणुका घेण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक होत आहे," असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगJharkhandझारखंड