शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

“आमची परीक्षा घेऊ नका, आवाज उठवायचा म्हटलं तर...”; छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्र्यांवर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 16:29 IST

सरकारने ठरवावं तेव्हा आम्ही बैठकीला बसण्याची तयारी आहे. पण सरकार तयार नसेल तर आम्हाला रायगडावर मूक आंदोलन घ्यावं लागेल असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

मुंबई – नांदेड इथं आम्ही न बोलवता सुद्धा ५० ते ७० हजार लोकं जमली होती. आवाज उठवायचा म्हटलं तर मी तेही करू शकतो. जर सरकार दखल घेत नसेल तर आम्हाला करायचं ते आम्ही करू शकतो. नांदेड फक्त एक झलक होती. तीही नं सांगता, मग सांगून बघू का? मग बघा अशा शब्दात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून(Maratha Reservation) ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

छ. संभाजीराजे म्हणाले की, सरकारने ठरवावं तेव्हा आम्ही बैठकीला बसण्याची तयारी आहे. पण सरकार तयार नसेल तर आम्हाला रायगडावर मूक आंदोलन घ्यावं लागेल. त्यासाठी तयारी आहे. पुन्हा नांदेडला जशी गर्दी जमली तशी गर्दी झाली तर आम्ही जबाबदार राहणार नाही. हे सरकारला चालेल का? समाजाला वेठीस न धरता एकटं आंदोलन करू ज्यामुळे गर्दी होणार नाही असंही त्यांनी सांगितले.

तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाला १८८५ कोटी निधी वाटला असं सांगतात, हे अधिकारी फसवतात. हे सरकारने दिलेले नसून बँकांनी पैसे दिलेत. हे मागच्या सरकारचे आहेत. तुम्ही किती दिलेत ते सांगावं. आत्ता जाहीर केलेले साडेबारा कोटीही मागील सरकारच्या काळातील आहे. सध्याच्या सरकारने काहीही केलेले नाही असा आरोप छत्रपती संभाजीराजे(Chhatrapati SambhajiRaje) यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी पत्राची दखलही घेतली नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले पत्र मान्य नाही. राज्य सरकारनं पाठवलेले पत्र हे अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे. फक्त पाठवायचं म्हणून लेखी उत्तर पाठवलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनीही याची पुरेशी दखल घेतली नाही अशी टीका छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

'गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा

काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये मराठा समाजाकडून मुक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होतं. या आंदोलनात कोविक प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन झाल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. यात एकूण २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याच मुद्द्यावरुन भाजपा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला होता. "गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरीब मराठा बांधवांवर का? समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळ न्याय, असे का?", असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीUddhav Thackerayउद्धव ठाकरे