शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

भुजबळांनी पंतप्रधान व्हावं, प्रत्येकवेळी...; कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 14:19 IST

प्रत्येक माणसाला मंत्रिमंडळात सामावून घेणे शक्य नाही. मंत्रिमंडळाची संख्या मर्यादित आहे असं कोकाटे यांनी सांगितले. 

नाशिक - सरकार स्थापन होऊन ४ दिवस झालेत, दम तर काढला पाहिजे. छगन भुजबळांना जे वाटतं ते त्यांनी मागावे. मला वाटतं भुजबळांनी देशाचा पंतप्रधान व्हावे. मला काय वाटतं असेच थोडी होते. जशी मागणी असेल, नेतृत्वाला विचार करायला संधी मिळेल तसे पुढे होते. आम्ही ५ टर्म थांबलो, २० वर्ष तुम्ही मंत्रिमंडळात होतात आम्ही काही बोललो का? पक्ष वेगळा झाला तरी मंत्रिपद दिले तेव्हा आमच्यापैकी कुणी येऊन माध्यमांना नाराज आहोत असं सांगितले का? बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदल हा होत असतो असं सांगत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळांना खोचक टोला लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यात भुजबळ समर्थक ओबीसी संघटनांची आज बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, राजकारणात बदल स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. लोकसभेच्या काळात अनेक लोकांनी निर्णय घेतला. आता लावलेले पोस्टर्स कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत. मला विचारून पोस्टर लावलेले नाहीत. माझ्या मतदारसंघात अनेक कार्यक्रमात भुजबळांचे फोटो मी लावलेच आहेत. त्यामुळे सिन्नरमध्ये जे बॅनर लागलेत त्यात भुजबळांचा फोटो नसेल तर तो माझा दोष नाही, कार्यकर्त्याचा आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच अजितदादांचा वादा पक्का आहे. एखादी गोष्ट बोलली तर त्यातून मागे फिरत नाहीत. मी दादांनाच सिन्नरला उभे राहण्यास सांगितले होते. जेव्हा अजितदादांना गरज पडेल तेव्हा मी सिन्नरची जागा रिक्त करून द्यायलाही तयार आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे. सर्वाधिक आमदार आमचे इथे आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे असं मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, प्रत्येक माणसाला मंत्रिमंडळात सामावून घेणे शक्य नाही. मंत्रिमंडळाची संख्या मर्यादित आहे. काहींना संधी मागे मिळाली, काहींना संधी आता मिळाली. एकाच व्यक्तीला सारखी सारखी संधी दिली तर बाकीच्यांना कधी मिळणार आहे? अनेक आमदार ५-६ टर्म निवडून आलेत तरी त्यांना संधी नाही. त्यामुळे दुसऱ्यांना संधी मिळाली पाहिजे हा विचारही आपण केला पाहिजे. त्यामुळे भुजबळ तो विचार करतील असं मला वाटते असंही माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळManikrao Kokateमाणिकराव कोकाटेAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुती