शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘भानू फरसाण’चा खाद्यपदार्थ परवाना तपासणार , अग्निशमन दलही करणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 03:31 IST

खाद्यपदार्थ बनविण्याच्या दुकानाला लागणारा परवाना व ना-हरकत प्रमाणपत्र ‘भानू फरसाण’ या दुकान मालकाने घेतले होते की नाही, याची आता तपासणी करण्यात येणार आहे. एल विभागाचे वैद्यकीय अधिकारी आणि मुंबई अग्निशमन दलाकडून ही बाब तपासण्यात येत आहे. या बाबींची पूर्तता केली नसल्यास चौकशी करून संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई : खाद्यपदार्थ बनविण्याच्या दुकानाला लागणारा परवाना व ना-हरकत प्रमाणपत्र ‘भानू फरसाण’ या दुकान मालकाने घेतले होते की नाही, याची आता तपासणी करण्यात येणार आहे. एल विभागाचे वैद्यकीय अधिकारी आणि मुंबई अग्निशमन दलाकडून ही बाब तपासण्यात येत आहे. या बाबींची पूर्तता केली नसल्यास चौकशी करून संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्यात येणार आहे.आगीची मुंबई अग्निशमन दलाकडून स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. दुकानातील पोटमाळा अनधिकृत असल्याचे आढळल्यास, जबाबदार अधिकारी वर्गावर कारवाई करण्यात येणार आहे.खाद्यपदार्थांना आग-आग इलेक्ट्रिक वायरिंगच्या ठिकाणी आटोक्यात आणण्यात आली होती. दुकानात मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ होते. ६० बाय ३०च्या या दुकानाला आगीने वेढले होते. आगीच्या तीव्रतेमुळे दुकान कोसळले. अग्निशमन दलाने १२ कामगारांना बाहेर काढत राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.नक्की काय घडले...4.16 वाजता पहाटे दुकानाला आग लागल्याचीमाहिती मुंबई महापालिकानियंत्रण कक्षाला पोलीस नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली.4.17वाजता ही माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षास देण्यात आली.4.18वाजता फरसाण दुकानास आग असून, यामध्ये आठ ते नऊ माणसे अडकल्याचे सांगण्यात आले.4.38वाजता आग विझल्याचा कॉल देण्यात आला. चार फायर इंजिन आणि चार टँकरच्या मदतीने आग विझविण्यात आली.आगीची चौकशी होणारउपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) आणि मुंबई अग्निशमन दलामार्फत या घटनेची चौकशी होणार आहे. यामध्ये कारखान्यासाठी आवश्यक सर्व परवानगी नसल्यास, तसेच पोटमाळा बेकायदा आढळल्यास संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिला आहे.रमेश भानुशालीला अटक-साकीनाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रमेश भानुशाली यास अटककरण्यात आली आहे.दोन्ही भाऊ ठारनईम मिर्झा आणि वसिम मिर्झा या दोन्ही भावांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी हे दोघे या दुकानात कामाला लागले होते.तातडीने उपचार : रुग्णालयात ८ वाजेपर्यंत १२ मृतदेह आणण्यात आले होते. जखमी अवस्थेत कोणीही दाखल झाले नाही. डॉक्टर व कर्मचारी वर्गाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जखमी अवस्थेत कोणी आल्यास, त्यावर तातडीने उपचार सुरू करण्याची तयारी होती, अशी माहिती राजावाडी रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.उडी मारली अन् ‘तो’ वाचला... फरसाणच्या दुकानामधील सिलिंडरच्या स्फोटाचा आवाज ऐकताच, १३ कामगारांपैकी अखिलेश रामकिशोर तिवारी या कामगाराने दुकानाच्या खिडकीतून खाली उडी मारली. खिडकीतून बाहेर पडलेल्या अखिलेशचा जीव वाचला खरा. मात्र, या दुर्घटनेत तो जखमी झाला आहे. त्याला पायाला फ्रॅक्चर झाले असून, त्याच्यावरट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.धुरामुळे गुदमरून मृत्यू? : स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आग लागली, तेव्हा हे कर्मचारी जागे होते. आगीच्या धुरामुळे श्वास गुदरमून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, त्यांचे शरीर आगीत भाजले गेले, परंतु आता शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण समोर येईल.

टॅग्स :fireआगMumbaiमुंबई