शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

अकरावी व बारावीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये बदल

By admin | Published: July 17, 2017 9:52 PM

देशपातळीवरील नीट आणि जेईई या प्रवेश परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून...

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 17 : देशपातळीवरील नीट आणि जेईई या प्रवेश परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता अकरावी व बारावीच्या विज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल केला आहे. त्यानुसार आता पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकाला महत्व प्राप्त झाले आहे. प्रश्नांचे बहुपर्याय बंद करण्यात आले असून एका प्रश्नाला त्याच घटकातील प्रश्नाचा पर्याय राहणार आहे. त्यामुळे शिक्षकांना अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक शिकवावा लागणार असून घोकंपट्टीलाही मर्यादा येणार आहे.राज्यातील विद्यार्थ्यांना नीट व जेईई या परीक्षांना सामोरे जाताना खुप अडचणी येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून सतत केल्या जात होत्या. मंडळाचा अभ्यासक्रम तसेच प्रश्नपत्रिकांचे स्वरूप योग्य नसल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार मंडळाकडून अभ्यासक्रमात बदल करण्यापासून प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलण्याबाबत सातत्याने चाचपणी करण्यात आली. त्यातच कौन्सिल आॅफ बोर्ड्स आॅफ स्कुल एज्युकेशन इन इंडियाने (कॉब्से) देशातील इयत्ता अकरावी व बारावी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित आणि संख्याशास्त्र या चार विषयांच्या परीक्षांचे देशपातळीवर एकाच पध्दतीचे आराखडे तयार केले होते. त्याप्रमाणे राज्य मंडळाने नीट व जेईई परीक्षा तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून या चार विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे नवीन आराखडे तयार केले आहेत. राज्य शासनाकडूनही या आराखड्यांना मान्यता मिळाली असून चालु शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावीसाठी त्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. तर इयत्ता बारावीची फेब्रुवारी २०१९ मधील परीक्षा सुधारीत आराखड्यानुसार असेल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.चारही विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदलताना प्रचलित अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयाच्या १०० गुणांपैकी लेखी परीक्षा ७०, तर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी ३० गुण असतील. गणित आणि संख्याशास्त्र विषयासाठी ८० गुणांची लेखी, तर २० गुण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असतील. लेखी परीक्षेसाठी प्रत्येकी एकच प्रश्नपत्रिका व एकच उत्तरपत्रिका राहील. या परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर राहतील. प्रात्यक्षिक परीक्षांच्या आराखड्यातही बदल करण्यात आलेला नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. प्रश्नपत्रिकांमध्ये बदल करताना प्रामुख्याने नीट, जेईई तसेच देशपातळीवरील इतर प्रवेश परीक्षांचा विचार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना काही अडचणी येत होत्या. सुधारीत प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यामुळे या परीक्षांना सामोरे जाताना अडचणी येणार नाहीत. पुर्वी प्रश्नपत्रिकांमध्ये चार-पाच प्रश्न देवून त्यातील दोन-तीन प्रश्न सोडविण्यास सांगितले जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त पर्याय मिळत होते. आता त्यात बदल करण्यात आला आहे. सुधारीत आराखड्यामध्ये एका प्रश्नाला एकच पर्यायी प्रश्न असेल. हे प्रश्नही पाठ्यपुस्तकातील एकाच घटकाशी संंबंधित असणार आहे. तसेच काठिण्यपातळीही नीट व जेईई प्रमाणे ठरविण्यात आली आहे. यामुळे शिक्षकांना आता अभ्यासक्रमातील कोणताही घटक बाजुला ठेवता येणार नाही. प्रत्येक घटक शिकवावाच लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही केवळ पाठांतर करून भागणार नाही, असे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.