शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

ऋतूप्रमाणे करा आहारात बदल

By admin | Updated: March 2, 2017 02:33 IST

दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्री थंड वारे असे काहीसे वातावरण सध्या मुंबईत आहे.

दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्री थंड वारे असे काहीसे वातावरण सध्या मुंबईत आहे. मात्र दिवसा असणारा उन्हाचा पारा हा येत्या उन्हाळ्याचा ‘ट्रेलर’ आहे असे दिसून येते. त्यामुळे भविष्यात उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यात पाणी जास्त पिणे, द्रवपदार्थांचे सेवन अधिक करणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.जेव्हा एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होतो, त्या वेळेस वातावरणात हळूहळू बदल होऊ लागतात आणि याच काळात आरोग्यास फार जपावे लागते. पूर्वीच्या ऋतूमधील वातावरणाची शरीरास सवय झालेली असते. त्यामुळे वातावरणात होणाऱ्या बदलाचा परिणाम शरीरावर फार पटकन होत असतो. याचवेळी आहार-विहारावर फार नियंत्रण ठेवावे लागते. पूर्वीच्या ऋतूत योग्य असणारा आहार कदाचित पुढील ऋतूसाठी योग्य ठरू शकत नाही. परंतु, आहार-विहारातील बदल लगेच करू नयेत. पूर्वीच्या ऋतूतील आहार हळूहळू कमी करून पुढील ऋतूसाठी योग्य असणारा आहार सुरू करावा. जर हळूहळू क्रमाक्रमाने हा बदल घडवून आणला, तरच आरोग्य टिकून राहते. प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील दोष म्हणजेच वात, पित्त व कफ यांची स्थितीही वेगवेगळी असते व त्यानुसार त्या व्यक्तीस शारीरिक समस्या उद्भवत असतात. प्रत्येक व्यक्तीने कुशल वैद्याच्या मार्गदर्शनाने आपली प्रकृती जाणून घेतली पाहिजे. आपल्या स्वत:ला आपली प्रकृती माहिती असल्याने योग्य तो आहार-विहार अवलंबणे सोपे जाते.या दिवसांत पाणीदार फळे आणि भाज्यांचा आहारात अधिक समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र म्हणून उघड्यावर कापून ठेवलेली फळे खाणे टाळावे. उन्हाळ्याच्या दिवसांत आंबट, खारट आणि तिखट पदार्थ खाणे टाळावेत. उलट गोड, कडू आणि तुरट स्वादाचे सेवन अधिक करावे. फार जड व पचनशक्तीवर ताण पडेल असे पदार्थ खाऊ नयेत. ज्यांना उन्हाळा बाधत नाही अशांनी दह्याचे सेवन अधिक प्रमाणात करावे. उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर किरणांचा आणि उष्णतेचा आरोग्यावर परिणाम होतो. बऱ्याच शारीरिक समस्यांचे मूळ हे आहारात आणि आपल्या पचन संस्थेत होणाऱ्या बदलांमध्ये असते. -- डॉ. आस्था शर्मा, आहारतज्ज्ञ