शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

ऋतूप्रमाणे करा आहारात बदल

By admin | Updated: March 2, 2017 02:33 IST

दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्री थंड वारे असे काहीसे वातावरण सध्या मुंबईत आहे.

दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्री थंड वारे असे काहीसे वातावरण सध्या मुंबईत आहे. मात्र दिवसा असणारा उन्हाचा पारा हा येत्या उन्हाळ्याचा ‘ट्रेलर’ आहे असे दिसून येते. त्यामुळे भविष्यात उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यात पाणी जास्त पिणे, द्रवपदार्थांचे सेवन अधिक करणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.जेव्हा एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होतो, त्या वेळेस वातावरणात हळूहळू बदल होऊ लागतात आणि याच काळात आरोग्यास फार जपावे लागते. पूर्वीच्या ऋतूमधील वातावरणाची शरीरास सवय झालेली असते. त्यामुळे वातावरणात होणाऱ्या बदलाचा परिणाम शरीरावर फार पटकन होत असतो. याचवेळी आहार-विहारावर फार नियंत्रण ठेवावे लागते. पूर्वीच्या ऋतूत योग्य असणारा आहार कदाचित पुढील ऋतूसाठी योग्य ठरू शकत नाही. परंतु, आहार-विहारातील बदल लगेच करू नयेत. पूर्वीच्या ऋतूतील आहार हळूहळू कमी करून पुढील ऋतूसाठी योग्य असणारा आहार सुरू करावा. जर हळूहळू क्रमाक्रमाने हा बदल घडवून आणला, तरच आरोग्य टिकून राहते. प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील दोष म्हणजेच वात, पित्त व कफ यांची स्थितीही वेगवेगळी असते व त्यानुसार त्या व्यक्तीस शारीरिक समस्या उद्भवत असतात. प्रत्येक व्यक्तीने कुशल वैद्याच्या मार्गदर्शनाने आपली प्रकृती जाणून घेतली पाहिजे. आपल्या स्वत:ला आपली प्रकृती माहिती असल्याने योग्य तो आहार-विहार अवलंबणे सोपे जाते.या दिवसांत पाणीदार फळे आणि भाज्यांचा आहारात अधिक समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र म्हणून उघड्यावर कापून ठेवलेली फळे खाणे टाळावे. उन्हाळ्याच्या दिवसांत आंबट, खारट आणि तिखट पदार्थ खाणे टाळावेत. उलट गोड, कडू आणि तुरट स्वादाचे सेवन अधिक करावे. फार जड व पचनशक्तीवर ताण पडेल असे पदार्थ खाऊ नयेत. ज्यांना उन्हाळा बाधत नाही अशांनी दह्याचे सेवन अधिक प्रमाणात करावे. उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर किरणांचा आणि उष्णतेचा आरोग्यावर परिणाम होतो. बऱ्याच शारीरिक समस्यांचे मूळ हे आहारात आणि आपल्या पचन संस्थेत होणाऱ्या बदलांमध्ये असते. -- डॉ. आस्था शर्मा, आहारतज्ज्ञ