शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Shiv Sena Vs BJP: “आगामी काळात भाजपमध्येच इतके लोकं येतील की, मविआला उमेदवारच मिळणार नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 19:44 IST

Shiv Sena Vs BJP: उद्धव ठाकरेंचा पक्ष नसून केवळ एक गट आहे. आगामी काळात दोन चार कार्यकर्ते त्यांच्याकडे शिल्लक राहतील, असा दावा भाजपने केला आहे.

Maharashtra Political Crisis: आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने आतापासूनच कंबर कसली असून, मागील वेळेस थोडक्यासाठी पराभव पत्कराव्या लागलेल्या देशभरातील अनेक मतदारसंघावर भर देण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री कामाला लागले आहेत. दुसरीकडे, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही भाजपने भर दिला असून, नेत्यांच्या भाजपमधील इन्कमिंगला सुरुवात झाली आहे. आगामी काळात भाजपमध्येच इतके लोकं येतील की, मविआला उमेदवारच मिळणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 

अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांच्यासह काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मीडियाशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, येणाऱ्या दिवसात भारतीय जनता पक्षामध्ये एवढे प्रवेश होईल की २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांना उमेदवार मिळणार नाही. शिंदे यांचाच गट खरी शिवसेना असून उद्धव ठाकरे यांच्याकडे दोन चार कार्यकर्ते शिल्लक राहतील, असा दावा बावनकुळे यांनी केला. 

उद्धव ठाकरे यांचा पक्ष नाही तर एक गट आहे

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील अनेक प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. महाविकास आघाडीला २०२४ मध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार मिळणार नाही अशी स्थिती निर्माण होईल. शिवसेनेतील काही कार्यकर्ते शिंदे गटात आणि काही भाजपमध्ये येत आहेत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष नाही तर शिवसेनेतील एक गट आहे. चार पाच लोकांचे ऐकून उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका दिला, या शब्दांत बावनकुळे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 

दरम्यान, वानखडेच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना भाजपमध्ये आली आहे. याशिवाय विदर्भातील विविध जिल्ह्यातील शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांचाही टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडेल. भाजप-मनसे युतीचे आता काही ठरले नाही. पुढे निर्णय घेऊ असे सांगून बावनकुळे यांनी मनसेशी युतीचे संकेत दिले. शिवसेनेत कार्यकर्त्यांना सन्मान दिला जात नसल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे राजेश वानखेडे यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी