शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

Chandrakant Patil : केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय, चंद्रकात पाटलांचा सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 12:44 IST

Chandrakant Patil : आठवीतल्या विद्यार्थ्यांनाही कळतं, अनिल परब यांची गृह खात्यात लुडबूड होतेय, याबद्दल शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. अनिल परब यांनी विधानसभेतही वाझेंप्रकरणात विशेष लक्ष घातलं होतं

ठळक मुद्देलसीकरणाच्या मुद्यावरुन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्य सरकारला ठोक ठोक ठोकलंय, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यानी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केलीय.

मुंबई - राज्यात पुढील 3 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. तसेच, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केलीय. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांत लसरीकरण बंद पडण्याची भीती टोपे यांनी व्यक्त केली. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारमुळे अख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधी लढ्याला फटका बसल्याचं सांगत ठाकरे सरकावर जोरदार टीका केली. डॉ. हर्षवर्धन यांच्या टीकेनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज्य सरकारवर घणाघाती टीका केलीय. 

आठवीतल्या विद्यार्थ्यांनाही कळतं, अनिल परब यांची गृह खात्यात लुडबूड होतेय, याबद्दल शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. अनिल परब यांनी विधानसभेतही वाझेंप्रकरणात विशेष लक्ष घातलं होतं. यावरुन, कुणालाही लक्षात येतं. सध्याच्या परिस्थितीवरुन सर्वसामान्य माणसांना वीट आलाय, असेही चंद्रकात पाटील यांनी म्हटले. राज्य सरकारकडून ही संघटीत गुन्हेगारी होत आहे. सर्वसामान्य माणसांना जो न्याय आहे, तोच इथे लागावा. याप्रकरणी मोक्का लावला पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केलीय. 

लसीकरणाच्या मुद्यावरुन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्य सरकारला ठोक ठोक ठोकलंय, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यानी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केलीय. महाराष्ट्रात इंजेक्शनचा पत्ता नाही, लसीकरणासाठी तुमचा योग्य कारभार नाही. प्रत्येक विषयात जर तुम्ही केंद्राला दोष देणार असाल तर केंद्राकडे राज्य चालवायला द्या, असेही पाटील म्हणाले. 

डॉ. हर्षवर्धन यांच्यावर काँग्रेसचा पलटवार

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या टीकेवर महाराष्ट्र काँग्रेसनं पलटवार केला. महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन प्रत्युत्तर देण्यात आलंय. ‘शेवटी आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा तथा मोदी सरकारचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाच! अपेक्षेप्रमाणे आणि आजवरच्या कारकिर्दीप्रमाणे त्यांनी आपल्या नियोजनशून्य कारभाराचे खापर राज्यांच्या खासकरुन बिगर भाजपशासित राज्यांच्या माथी फोडायला सुरवात केली आहे’, असा पलटवार महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे. (Allegations between the Center and the Maharashtra government over the shortage of corona vaccine)

डॉ. हर्षवर्धन यांनी शेअर केलं परिपत्रक

महाराष्ट्रात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचं सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात 3 दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याचं म्हटलंय. त्यावर एकट्या महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या वृत्तीमुळे अख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला फटका बसल्याची टीका डॉ. हर्षवर्धन यांनी केलीय. महाराष्ट्र सरकारकडून पुरेशा कार्यक्षमतेची कमतरता आता दिसू लागली आहे. त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागत आहेत, असंही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय. डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक परिपत्रकच शेअर केलंय.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबईchandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्री