शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी प्रवेश पात्रतेच्या निकषांना आव्हान

By admin | Updated: August 5, 2016 01:35 IST

विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या पात्रता निकषाच्या वैधतेला नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले

नागपूर : विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या पात्रता निकषाच्या वैधतेला नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने केलेल्या कायद्यातील निकषांमध्ये तफावत आहे. राज्याच्या निकषांमुळे यावर्षी ६५४२ विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी अपात्र ठरल्याचा दावा संबंधित याचिकेत करण्यात आला आहे.केंद्र शासनाने देशातील तंत्रशिक्षणाचा विकास व नियोजनासाठी ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद कायदा-१९८७’ लागू केला आहे. या कायद्यानुसार, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांत प्रवेश मिळविण्यासाठी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र व गणित हे दोन अनिवार्य विषय आणि रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवशास्त्र किंवा तांत्रिक व्यावसायिक विषय यापैकी एक विषय घेऊन खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के, तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी किमान ४० टक्के गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. परंतु, राज्य शासनाने ‘महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्था (प्रवेश व शुल्क नियमन) कायदा-२०१५’ लागू केला आहे.या कायद्यात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय प्रवेश पद्धती, सामायिक प्रवेश परीक्षा, शुल्क नियमन प्राधिकरणाची स्थापना आदीसंदर्भात तरतूद आहे. या कायद्यान्वये खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांतील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांत प्रवेश मिळविण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी किमान ५० टक्के, तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. विषयांसंदर्भातील वरील अट या कायद्यात जैसे थे लागू आहे. परंतु, गुणांची टक्केवारी वाढविण्यात आली आहे.>सीईटीमध्ये अधिक गुण मिळूनही प्रवेश नाहीराज्य शासनाच्या कायद्यानुसार बारावीमध्ये टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षी सीईटीमध्ये २, ५, ६, १० असे गुण असताना अभियांत्रिकी अभ्यासक्रमांत प्रवेश मिळाला आहे. परंतु, या कायद्यानुसार टक्केवारी नसलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये ११२ गुण मिळवूनही प्रवेशापासून वंचित राहावे लागले आहे. अशा विद्यार्थ्यांनी कृती समूह स्थापन करून उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. राज्य शासनाने केंद्र शासनाच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद कायद्याशी विसंगत कायदा लागू करणे अवैध असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कायद्यातील तरतुदीला आव्हान असल्यामुळे न्यायालयाने महाधिवक्त्यांना नोटीस बजावली आहे. याचिकेवर ५ आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.