शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

अभियांत्रिकी प्रवेश पात्रतेच्या निकषांना आव्हान

By admin | Updated: August 5, 2016 01:35 IST

विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या पात्रता निकषाच्या वैधतेला नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले

नागपूर : विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या पात्रता निकषाच्या वैधतेला नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने केलेल्या कायद्यातील निकषांमध्ये तफावत आहे. राज्याच्या निकषांमुळे यावर्षी ६५४२ विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी अपात्र ठरल्याचा दावा संबंधित याचिकेत करण्यात आला आहे.केंद्र शासनाने देशातील तंत्रशिक्षणाचा विकास व नियोजनासाठी ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद कायदा-१९८७’ लागू केला आहे. या कायद्यानुसार, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांत प्रवेश मिळविण्यासाठी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र व गणित हे दोन अनिवार्य विषय आणि रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवशास्त्र किंवा तांत्रिक व्यावसायिक विषय यापैकी एक विषय घेऊन खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के, तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी किमान ४० टक्के गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. परंतु, राज्य शासनाने ‘महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्था (प्रवेश व शुल्क नियमन) कायदा-२०१५’ लागू केला आहे.या कायद्यात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय प्रवेश पद्धती, सामायिक प्रवेश परीक्षा, शुल्क नियमन प्राधिकरणाची स्थापना आदीसंदर्भात तरतूद आहे. या कायद्यान्वये खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांतील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांत प्रवेश मिळविण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी किमान ५० टक्के, तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. विषयांसंदर्भातील वरील अट या कायद्यात जैसे थे लागू आहे. परंतु, गुणांची टक्केवारी वाढविण्यात आली आहे.>सीईटीमध्ये अधिक गुण मिळूनही प्रवेश नाहीराज्य शासनाच्या कायद्यानुसार बारावीमध्ये टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षी सीईटीमध्ये २, ५, ६, १० असे गुण असताना अभियांत्रिकी अभ्यासक्रमांत प्रवेश मिळाला आहे. परंतु, या कायद्यानुसार टक्केवारी नसलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये ११२ गुण मिळवूनही प्रवेशापासून वंचित राहावे लागले आहे. अशा विद्यार्थ्यांनी कृती समूह स्थापन करून उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. राज्य शासनाने केंद्र शासनाच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद कायद्याशी विसंगत कायदा लागू करणे अवैध असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कायद्यातील तरतुदीला आव्हान असल्यामुळे न्यायालयाने महाधिवक्त्यांना नोटीस बजावली आहे. याचिकेवर ५ आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.