शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

श्रीगोंद्यात लागणार विखेंचा कस; आघाडीचा गड पाडण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 6:22 PM

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ हा आघाडीचा बालेकिल्ला समजला जातो. १९६२ पासून राष्ट्रवादी-काँग्रेसचे सात वेळा आमदार येथून निवडणून आले आहेत.

मुंबई – राज्यात आणि देशात भाजपची सरकार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजपने पुन्हा सत्ता मिळवली. त्यात महाराष्ट्राच्या राजकरणाचा केंद्रबिंदू असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा भाजपने आता गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रूपाने आपली ताकद वाढवली आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आज पर्यंत भाजपला एकदाही आमदार निवडणून आणता आले नाही. त्यामुळे आता विखे पाटील हे तरी आघडीच्या गडाला पाडणार का अशी चर्चा आहे.

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ हा आघाडीचा बालेकिल्ला समजला जातो. १९६२ पासून राष्ट्रवादी-काँग्रेसचे सात वेळा आमदार येथून निवडणून आले आहेत. युतीत हा मतदारसंघ भाजपकडे आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत भाजपला एकदाही इथे उमदेवार निवडणून आणता आले नाहीत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार बबनराव पाचपुते यांना सुद्धा भाजपला विजय मिळवून देता आला नाही. राष्ट्रवादीचे उमदेवार राहुल जगताप यांनी पाचपुते यांचा १३ हजार ६३७ मतांनी पराभव केला होता.

विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाने नगर जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे नगरमध्ये  गेल्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात भाजपला अपयश आले होते. अशा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आगामी निवडणुकीत निवडून आणण्याचे आव्हान विखेंना असणार आहे. त्यातच गेल्यावेळी पाचपुते सारखे मातब्बर नेत्याला श्रीगोंदामधून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा मतदारसंघात भाजपचा उमदेवार यावेळी तरी विखे निवडणून आणतील का ? अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.