शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

श्रीगोंद्यात लागणार विखेंचा कस; आघाडीचा गड पाडण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 18:31 IST

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ हा आघाडीचा बालेकिल्ला समजला जातो. १९६२ पासून राष्ट्रवादी-काँग्रेसचे सात वेळा आमदार येथून निवडणून आले आहेत.

मुंबई – राज्यात आणि देशात भाजपची सरकार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजपने पुन्हा सत्ता मिळवली. त्यात महाराष्ट्राच्या राजकरणाचा केंद्रबिंदू असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा भाजपने आता गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रूपाने आपली ताकद वाढवली आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आज पर्यंत भाजपला एकदाही आमदार निवडणून आणता आले नाही. त्यामुळे आता विखे पाटील हे तरी आघडीच्या गडाला पाडणार का अशी चर्चा आहे.

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ हा आघाडीचा बालेकिल्ला समजला जातो. १९६२ पासून राष्ट्रवादी-काँग्रेसचे सात वेळा आमदार येथून निवडणून आले आहेत. युतीत हा मतदारसंघ भाजपकडे आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत भाजपला एकदाही इथे उमदेवार निवडणून आणता आले नाहीत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार बबनराव पाचपुते यांना सुद्धा भाजपला विजय मिळवून देता आला नाही. राष्ट्रवादीचे उमदेवार राहुल जगताप यांनी पाचपुते यांचा १३ हजार ६३७ मतांनी पराभव केला होता.

विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाने नगर जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे नगरमध्ये  गेल्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात भाजपला अपयश आले होते. अशा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आगामी निवडणुकीत निवडून आणण्याचे आव्हान विखेंना असणार आहे. त्यातच गेल्यावेळी पाचपुते सारखे मातब्बर नेत्याला श्रीगोंदामधून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा मतदारसंघात भाजपचा उमदेवार यावेळी तरी विखे निवडणून आणतील का ? अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.