शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

श्रीगोंद्यात लागणार विखेंचा कस; आघाडीचा गड पाडण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 18:31 IST

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ हा आघाडीचा बालेकिल्ला समजला जातो. १९६२ पासून राष्ट्रवादी-काँग्रेसचे सात वेळा आमदार येथून निवडणून आले आहेत.

मुंबई – राज्यात आणि देशात भाजपची सरकार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजपने पुन्हा सत्ता मिळवली. त्यात महाराष्ट्राच्या राजकरणाचा केंद्रबिंदू असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा भाजपने आता गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रूपाने आपली ताकद वाढवली आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आज पर्यंत भाजपला एकदाही आमदार निवडणून आणता आले नाही. त्यामुळे आता विखे पाटील हे तरी आघडीच्या गडाला पाडणार का अशी चर्चा आहे.

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ हा आघाडीचा बालेकिल्ला समजला जातो. १९६२ पासून राष्ट्रवादी-काँग्रेसचे सात वेळा आमदार येथून निवडणून आले आहेत. युतीत हा मतदारसंघ भाजपकडे आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत भाजपला एकदाही इथे उमदेवार निवडणून आणता आले नाहीत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार बबनराव पाचपुते यांना सुद्धा भाजपला विजय मिळवून देता आला नाही. राष्ट्रवादीचे उमदेवार राहुल जगताप यांनी पाचपुते यांचा १३ हजार ६३७ मतांनी पराभव केला होता.

विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाने नगर जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे नगरमध्ये  गेल्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात भाजपला अपयश आले होते. अशा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आगामी निवडणुकीत निवडून आणण्याचे आव्हान विखेंना असणार आहे. त्यातच गेल्यावेळी पाचपुते सारखे मातब्बर नेत्याला श्रीगोंदामधून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा मतदारसंघात भाजपचा उमदेवार यावेळी तरी विखे निवडणून आणतील का ? अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.