शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

मुंबईला चकवा; सोसाट्याचा वारा, पाऊस, पडझड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 5:56 AM

२५ हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी केले स्थलांतर

सचिन लुंगसे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतही ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा दुष्परिणाम फारसा पाहायला मिळाला नाही. सोसाट्याचा वारा, पाऊस यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. सुरक्षेचा उपाय म्हणून विविध भागांतून सुमारे २५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.

वाऱ्याच्या वेगाने बुधवारी अलिबागला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबईलाही बसला. मुंबईच्या समुद्रकिनाºयावरील कुलाबा येथील गीतानगर, वरळी कोळीवाडा, दादर, माहीम, जुहू आणि वर्सोवा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यातच वारेही वेगाने वाहत होते. सकाळपासून सुरू असलेला पाऊस सायंकाळपर्यंत कोसळत असतानाच वादळ धडकण्याच्या म्हणजे दुपारच्या वेळी पावसाचा वेग ठिकठिकाणी वाढला आणि मुंबईकरांना धडकी भरली. सखल भागात विशेषत: जे नागरिक समुद्रकिनारी राहतात त्यांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी पावले उचलली होती. यात प्रामुख्याने वर्सोवा आणि वरळी येथील रहिवाशांचा समावेश होता. कुर्ला पश्चिमेकडील मिठी नदीच्या किनारी असलेल्या क्रांतिनगर येथील रहिवाशांनाही लगतच्या पालिकेच्या शाळेत हलविण्यात आले.चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध भागांतून सुमारे २० ते २५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.

दुपारी पावसाचा आणि वाºयाचा वेग वाढल्याने ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दल सज्ज होते. ६ चौपाट्यांवर ९३ जीवरक्षक, रेस्क्यू बोट, जेट स्की आदी तैनात होते. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एडीआरएफ) एकूण ८ तुकड्या, नौदलाच्या ५ तुकड्या मुंबईतील विविध ठिकाणांवर लक्ष ठेवून होत्या. यामध्ये कुलाबा, वरळी, वांद्रे, अंधेरी, मालाड आणि बोरीवलीचा समावेश होता. याव्यतिरिक्त नियंत्रण कक्षात असलेल्या ५ हजारांहून अधिक कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. पाणी साचण्याच्या संभाव्य ३०० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप उपलब्ध करण्यात आले होते.धोकादायक इमारतींची पाहणी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. कोसळलेल्या झाडांना तातडीने हटविण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यासाठी ९६ पथके तैनात होती. अतिसंवेदनशील ठिकाणी तसेच रुग्णालयांमध्ये वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून जनित्र (जनरेटर) उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते.ओडिशा सरकारसोबत सल्लामसलतओडिशा सरकारला वादळाशी संबंधित विविध आपत्तींचा सामना करण्याचा असलेला अनुभव लक्षात घेता, त्यांच्याशी प्रशासनाने सल्लामसलत केली. अशा आपत्तींमध्ये रस्त्यांवर कोसळलेली झाडे तातडीने हटविणे आवश्यक आहेत अन्यथा मदतकार्यावर परिणाम होऊ शकतो, हा सल्ला लक्षात घेऊन पालिकेसह इतर यंत्रणांनाही या कामामध्ये गरज पडल्यास सहकार्य करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची विनंती केली होती.३० हजार नागरिकांनी स्वत:हूनकेले स्थलांतरखबरदारीचा उपाय म्हणून पालिकेतर्फे सुमारे ३५ शाळा नागरिकांच्या तात्पुरत्या निवाºयासाठी निश्चित करण्यात आल्या होत्या. तेथे स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत सुमारे ३० हजार नागरिकांनी स्थलांतर केले. याशिवाय दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांवरूनही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ