शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंना 'खुर्ची' महत्वाची; शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही पडलेलं नाही : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 17:16 IST

कृषी कायद्यांचे स्वागत राज्यभर होत असताना हे सरकार शेतकरी हिताच्या आड येत असून आंधळे, बहिरे झाले आहे.

ठळक मुद्देबळीराजा ट्रॅक्टर पूजन व सन्मान रॅली 

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फ़क्त खुर्ची महत्वाची आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही पडलेले नाही. त्यांना शेतीमधले काहीही कळत नाही. मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांचे स्वागत राज्यभर होत असताना हे सरकार शेतकरी हिताच्या आड येत असून आंधळे, बहिरे झाले आहे. अशी टीका प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. 

   दौंड तालुक्यातील वरवंड ते चौफुला अशी ट्रॅक्टर यात्रा काढून या तीन कृषी कायद्याचे स्वागत बळीराजा सन्मान, ट्रक्टर पूजन व रॅली काढून करण्यात आले. पुढे या रॅलीचे चौफुला येथे सभेत रुपांतर झाले. भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे, आमदार सुजितसिंह ठाकुर, आमदार राहुल कुल, गणेश भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे, मकरंद कोरडे, सुधीर दिवे, आनंदराव राऊत, धर्मेंद्र खांडरे यावेळी उपस्थित होते.   

पाटील म्हणाले, राहुल गांधींनी ट्रक्टर जाळून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यांना शेती म्हणजे काय हेच समजत नाही. शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्यांच्या ट्रॅक्टर, नांगर हे शेतकऱ्यांच्या जीवनाचे साधनं आहेत. हे ते विसरले. या विधेयकांना पाठिंबा देत असून गांधींना इशारा देतोय की शेतकरी विधेयकांना विरोध करू नका. काहीं दिवसांपूर्वी या कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांना दिल्लीवरुन मॅडमचा रेटा आल्याने केवळ खुर्ची टिकवण्यासाठी कायद्याला स्थगिती दिली गेली. परंतु केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरत असतो. अशी कायद्याला स्थगिती देता येत नाही. मुळातच ठाकरेंना कायदा कळतो का हा प्रश्न आहे. ते या कायद्याला स्थगिता का देत आहेत?  कृषि उत्पन बाजार समितीला केवळ सेस गोळा करण्याचे काम आहे. सेस बंद होणार असल्यानेच यांच्या पोटात दुखत आहे. सेस गोळा करणे बापाची पेंड आहे काय.  शेतकऱ्यांना फायदेशीर असणाऱ्या कायद्यांना विरोध करून शेतकरी गरीब राहिला पाहिजे अशी त्यांचा धारणा आहे. 

या कायद्याच्या प्रसारासाठी शिवार सभा घेणार असून पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाचे आणि आभाराचे पत्र लिहून घेणार आहोत. असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलagricultureशेतीState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेCentral Governmentकेंद्र सरकार