शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

उद्धव ठाकरेंना 'खुर्ची' महत्वाची; शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही पडलेलं नाही : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 17:16 IST

कृषी कायद्यांचे स्वागत राज्यभर होत असताना हे सरकार शेतकरी हिताच्या आड येत असून आंधळे, बहिरे झाले आहे.

ठळक मुद्देबळीराजा ट्रॅक्टर पूजन व सन्मान रॅली 

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फ़क्त खुर्ची महत्वाची आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही पडलेले नाही. त्यांना शेतीमधले काहीही कळत नाही. मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांचे स्वागत राज्यभर होत असताना हे सरकार शेतकरी हिताच्या आड येत असून आंधळे, बहिरे झाले आहे. अशी टीका प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. 

   दौंड तालुक्यातील वरवंड ते चौफुला अशी ट्रॅक्टर यात्रा काढून या तीन कृषी कायद्याचे स्वागत बळीराजा सन्मान, ट्रक्टर पूजन व रॅली काढून करण्यात आले. पुढे या रॅलीचे चौफुला येथे सभेत रुपांतर झाले. भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे, आमदार सुजितसिंह ठाकुर, आमदार राहुल कुल, गणेश भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे, मकरंद कोरडे, सुधीर दिवे, आनंदराव राऊत, धर्मेंद्र खांडरे यावेळी उपस्थित होते.   

पाटील म्हणाले, राहुल गांधींनी ट्रक्टर जाळून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यांना शेती म्हणजे काय हेच समजत नाही. शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्यांच्या ट्रॅक्टर, नांगर हे शेतकऱ्यांच्या जीवनाचे साधनं आहेत. हे ते विसरले. या विधेयकांना पाठिंबा देत असून गांधींना इशारा देतोय की शेतकरी विधेयकांना विरोध करू नका. काहीं दिवसांपूर्वी या कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांना दिल्लीवरुन मॅडमचा रेटा आल्याने केवळ खुर्ची टिकवण्यासाठी कायद्याला स्थगिती दिली गेली. परंतु केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरत असतो. अशी कायद्याला स्थगिती देता येत नाही. मुळातच ठाकरेंना कायदा कळतो का हा प्रश्न आहे. ते या कायद्याला स्थगिता का देत आहेत?  कृषि उत्पन बाजार समितीला केवळ सेस गोळा करण्याचे काम आहे. सेस बंद होणार असल्यानेच यांच्या पोटात दुखत आहे. सेस गोळा करणे बापाची पेंड आहे काय.  शेतकऱ्यांना फायदेशीर असणाऱ्या कायद्यांना विरोध करून शेतकरी गरीब राहिला पाहिजे अशी त्यांचा धारणा आहे. 

या कायद्याच्या प्रसारासाठी शिवार सभा घेणार असून पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाचे आणि आभाराचे पत्र लिहून घेणार आहोत. असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलagricultureशेतीState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेCentral Governmentकेंद्र सरकार