शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरातील धोकादायक इमारतींना स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 16:45 IST

प्लॉटधारकांत संभ्रमाचं वातावरण, इमारतीचा स्लॅब पडून झाली होती दुर्घटना.

ठळक मुद्देप्लॉटधारकांत संभ्रमाचं वातावरणइमारतीचा स्लॅब पडून झाली होती दुर्घटना.

उल्हासनगर : इमारतीचे स्लॅब पडून झालेल्या दुर्घटनेच्या पाश्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतीला स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक केले. मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्याकडून स्थैर्यता प्रमाणपत्र घेऊन महापालिकेला सादर करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. उल्हासनगर महापालिका पावसाळ्यापूर्वी दरवर्षी धोकादायक इमारतीला नोटिसा देऊन, नागरिकांना इमारती खाली करण्याचे आवाहन करते. तसेच इमारत पडून जीवित व वित्तहानी झाल्यास नागरिकांना जबाबदार धरले. दरम्यान गेल्या १५ दिवसात मोहिनी व साईशक्ती इमारतीचा स्लॅब पडून १२ जणांचा बळी गेल्याने, सर्वस्तरातून महापालिकेच्या कारभारावर टीका झाली. अखेर आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी धोकादायक इमारती मध्ये राहणाऱ्या नागरिकांना २९ मे रोजी जाहीर आवाहन केले. धोकादायक इमारती मध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्याकडून इमारतीची तपासणी करून तसेच इमारतीची दुरुस्ती करून स्थैर्यता प्रमाणपत्र महापालिकेला सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान ऐन कोरोना महामारीत कोणत्या मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्याकडून धोकादायक इमारतीची तपासणी करावी?, असा प्रश्न व संभ्रम नागरिकांना पडला. महापालिकेनेच एखाद्या मान्यताप्राप्त सरंचनात्मक अभियंत्यांची नियुक्ती करून धोकादायक इमारतीची तपासणी करून तसेच दुरुस्ती सूचवून स्थैर्यता प्रमाणपत्र महापालिकेला परस्पर सादर करण्याची मागणी होत आहे. मोहिनी व साईशक्ती इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाल्याने, शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला. धोकादायक इमारतीला वाढीव चटईक्षेत्र मंजूर करून त्यांची पुनर्बांधणी करावी अशा मागणीने जोर धरला असून यातून हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महापालिका व राज्य शासनाने दुसरी घटना घडण्यापूर्वी ठोस निर्णय घेण्याची मागणीही होत आहे. 

धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण, समिती स्थापन रेतीवर बंदी असतांना शहरात सन १९९२ ते ९८ दरम्यान उलावा रेतीतून अनेक इमारतीचे बांधकाम झाले. त्याच दरम्यान अवैध इमारतीचे तोडण्यात आलेल्या स्लॅबची दुरुस्ती करून प्लॉटची विक्री झाली. अशाच इमारतीचे स्लॅब पडण्याच्या दुर्घटना होऊन अनेकांचे बळी जात आहेत. अखेर आयुक्तांनी अशा इमारतीचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रभाग समिती निहाय्य समिती स्थापन केली. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBuilding Collapseइमारत दुर्घटनाAccidentअपघात