शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

Corona Vaccine: तूर्तास तरी घरोघरी जाऊन लस देणे शक्य नाही; केंद्राची हायकोर्टात स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 16:43 IST

Corona Vaccine: केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात भूमिका मांडली आहे.

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा फटका बसला असून, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकार तयारीला लागले असून, लसीकरणावर भर दिला जात आहे. डिसेंबर अखेर भारतीयांचे लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास केंद्राने व्यक्त केला आहे. यासंदर्भात मुंबईउच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी तूर्तास तरी घरोघरी जाऊन लस देणे शक्य नसल्याचे केंद्राच्या वतीने उच्च न्यायालयाला सांगण्यात आले आहे. (centre tells to mumbai hc that near to door vaccination more appropriate than door to door)

मुंबई उच्च न्यायालयात घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीवेळी 'नेगवॅक'च्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारने भूमिका मांडली.

PM मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; जाणून घ्या

घराजवळ लसीकरण शक्य

घरोघरी जाऊन लसीकरण करण्याऐवजी घराजवळ लसीकरण असे धोरण स्वीकारून वयोवृद्ध, दिव्यांग यासारख्या घटकांतील व्यक्तींचे त्यांच्या घराजवळ लसीकरण करता येईल. कारण लसीकरणानंतर होणाऱ्या दुष्परिणामांची आकडेवारी चिंताजनक आहे. लस घेतल्यानंतर साइट इफेक्ट्स झालेल्यांचा आकडा २८ मे २०२१ पर्यंत २५ हजार ३०९ इतका होता. त्यापैकी १ हजार १८६ रुग्णांची प्रकृती गंभीर होती. लसीकरण झालेल्या एकूण व्यक्तींपैकी ४७५ जणांचे लसीकरणानंतर मृत्यू ओढवले आहेत, असे केंद्राने मुंबई उच्च न्यायालयास सांगून या मुद्द्याकडे लक्ष वेधले. 

आमची वायफळ बडबड, मग यांची मुक्ताफळ कोणतं प्रबोधन करतात? दरेकरांचा मिटकरींवर पलटवार

आताच्या निर्णयात बदल करण्याचा विचार करेल

लसीकरणानंतरच्या घटनांची वस्तुस्थिती, लशींची उपलब्धता, लसीकरणाविषयीच्या पायाभूत सुविधा व अन्य संबंधित घटकांचा विचार करून केंद्र सरकार नंतर परिस्थितीचा पुन्हा आढावा घेऊन आताच्या निर्णयात बदल करण्याचा विचार करेल, असे केंद्राने उच्च न्यायालयाला सांगितले आहे. 

दरम्यान, घरोघरी जाऊन लसीकरण केले असते, तर अनेक जीव वाचवता आले असते, असे खंडपीठाने म्हटले होते. मात्र, सकारात्मक विचार करून धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात भूमिका मांडली आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार