शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

Uddhav Thackeray : "केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागताहेत, जा म्हणताच..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 13:51 IST

Uddhav Thackeray And Sanjay Raut : "नुसतं घाबरून पक्षातून पळून गेलेल्यांसाठी मोठा धडा असणार आहे. राऊत ही लांब पल्ल्याची तोफ आहे" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पत्राचाळ प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १०० दिवसांनंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायायीन कोठडीत गेल्या १०० दिवसांपासून होते. जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. त्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. यानंतर आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. 

"केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागताहेत, कर नाही त्याला डर कशाला" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी घणाघात केला आहे. "संजय माझा जीवलग मित्र आहे. न्यायदेवतेचे मी या निर्णयासाठी आभार मानतो, निकालपत्रात परखडपणे काही निरिक्षणं नोंदवली. केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागतं आहे. याच्या अंगावर जा म्हणताच त्याच्या अंगावर जात आहेत. जग बघतंय, देश बघतोय. खोट्या केसेसमध्ये पुन्हा संजय राऊतांना गोवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो" असं ठाकरेंनी म्हटलं आहे. 

"कर नाही त्याला डर कशाला... नुसतं घाबरून पक्षातून पळून गेलेल्यांसाठी मोठा धडा असणार आहे. राऊत ही लांब पल्ल्याची तोफ आहे. राऊत कुटुंबाचं कौतुक करायला हवं. संजय आमच्याच कुटुंबातला... आमच्यासाठीही हा काळ खडतर होता. न घाबरता कसं लढू शकतो हो दाखवून दिलं" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे पोहचले. त्यावेळी त्यांच्या आई, पत्नी आणि भाऊ यांनी त्यांचं स्वागत केलं. संजय राऊत यांनी यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. 

मला याच रस्त्यावरुन अटक करुन घेऊन गेले होते. त्यावेळीही मी सांगितलं होतं, की मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. या पुढे महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना राहिल, असं संजय राऊत म्हणाले. तसेच मी १०३ दिवस तुरुंगात राहिलो, आता शिवसेनेचे १०३ आमदार निवडून आणणार, असं निर्धार व्यक्त करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे. बाहेर काय सुरू होतं, ते आत राहून कळतं नव्हतं. बाहेर येऊन समजतंय की, आता उद्धव ठाकरेंचीशिवसेना झाली आहे. पण, एकच शिवसेना खरी आहे, बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना, बाकी सगळे धोत्र्याच्या बिया आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत