शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

Uddhav Thackeray : "केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागताहेत, जा म्हणताच..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 13:51 IST

Uddhav Thackeray And Sanjay Raut : "नुसतं घाबरून पक्षातून पळून गेलेल्यांसाठी मोठा धडा असणार आहे. राऊत ही लांब पल्ल्याची तोफ आहे" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पत्राचाळ प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १०० दिवसांनंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायायीन कोठडीत गेल्या १०० दिवसांपासून होते. जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. त्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. यानंतर आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. 

"केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागताहेत, कर नाही त्याला डर कशाला" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी घणाघात केला आहे. "संजय माझा जीवलग मित्र आहे. न्यायदेवतेचे मी या निर्णयासाठी आभार मानतो, निकालपत्रात परखडपणे काही निरिक्षणं नोंदवली. केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागतं आहे. याच्या अंगावर जा म्हणताच त्याच्या अंगावर जात आहेत. जग बघतंय, देश बघतोय. खोट्या केसेसमध्ये पुन्हा संजय राऊतांना गोवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो" असं ठाकरेंनी म्हटलं आहे. 

"कर नाही त्याला डर कशाला... नुसतं घाबरून पक्षातून पळून गेलेल्यांसाठी मोठा धडा असणार आहे. राऊत ही लांब पल्ल्याची तोफ आहे. राऊत कुटुंबाचं कौतुक करायला हवं. संजय आमच्याच कुटुंबातला... आमच्यासाठीही हा काळ खडतर होता. न घाबरता कसं लढू शकतो हो दाखवून दिलं" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे पोहचले. त्यावेळी त्यांच्या आई, पत्नी आणि भाऊ यांनी त्यांचं स्वागत केलं. संजय राऊत यांनी यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. 

मला याच रस्त्यावरुन अटक करुन घेऊन गेले होते. त्यावेळीही मी सांगितलं होतं, की मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. या पुढे महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना राहिल, असं संजय राऊत म्हणाले. तसेच मी १०३ दिवस तुरुंगात राहिलो, आता शिवसेनेचे १०३ आमदार निवडून आणणार, असं निर्धार व्यक्त करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे. बाहेर काय सुरू होतं, ते आत राहून कळतं नव्हतं. बाहेर येऊन समजतंय की, आता उद्धव ठाकरेंचीशिवसेना झाली आहे. पण, एकच शिवसेना खरी आहे, बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना, बाकी सगळे धोत्र्याच्या बिया आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत