शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

केंद्रीय पथक उद्यापासून करणार नुकसानीची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:21 IST

राज्यात अतिवृष्टीने झालेल्या पीकहानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २२,२३ आणि २४ नोव्हेंबर रोजी दौऱ्यावर येत आहे.

मुंबई : राज्यात अतिवृष्टीने झालेल्या पीकहानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २२,२३ आणि २४ नोव्हेंबर रोजी दौऱ्यावर येत आहे. औरंगाबाद विभागात डॉ. व्ही. तिरुपुगल आणि डॉ. मनोहरन, नागपूर आणि अमरावती विभागात डॉ. आर. पी. सिंग तर नाशिक विभागात दीनानाथ आणि डॉ. सुभाषचंद्र हे अधिकारी पाहणी करतील. त्यानंतर हे पथक पीकहानीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करेल.राज्यात अवकाळी पावसाने ९० लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यपालांनी हेक्टरी ८ हजार रुपयांपर्यंतची मदत जाहीर केली आहे, ती केवळ दोन हेक्टरपर्यंत असेल. शिवाय, बागायती शेतीसाठी १३५०० रुपये तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत दोन हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे. तथापि, नुकसान खरीप पिकांचे झाले असून, ९० टक्के पिके कोरडवाहू असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपयेच मदत मिळेल. दोन हेक्टरच्या मर्यादेमुळे ती १६ हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल. ही मदत तोकडी असल्याची टीका सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीतून लागवडीचाही खर्च निघणार नाही, अशी भावना आहे.नंतरच केंद्राची मदतसध्या जी मदत जाहीर झाली आहे ती राज्याच्या तिजोरीतून दिली जाणार आहे. केंद्राने अद्याप एक पैसाही दिलेला नाही. केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर केंद्र सरकार मदत जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस