शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 11:05 IST

Sanjay Raut: गुजरातमधून २ हजार टन कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Gujarat Onion Export : निर्यातबंदीमुळे महाराष्ट्रातील कांदा कवडीमोल दराने विकला जात असताना केंद्र सरकारने गुजरातला झुकतं माप दिलं आहे. मराष्ट्रात कांद्याची निर्यातबंदी कायम असताना केंद्राने गुजरातमधील दोन हजार टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. निर्यातबंदीच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी संतप्त झाला असून महाविकास आघाडीने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे अशी मोदींची भूमिका आहे अशी खरमरीत टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

राज्यात कांदा निर्यातबंदी असताना केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ऐन गुजरातमधून २००० मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीस मंजुरी दिली आहे. गुजरातमधील मुंद्रा पोर्ट, पिपापाव पोर्ट आणि महाराष्ट्रातील नवी मुंबईच्या न्हावा-शेवा म्हणजेच जेएनपीए बंदरातून गुजरातच्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. या निर्यणावरुन खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

"अमूल डेरीने आमची जनावरं जगवण्यासाठी इथे चारा पाठवला म्हणून नरेंद्र मोदींनी अमूलच्या संचालकांवर गुन्हे दाखल करुन खटले चालवले. हा मोदींचा महाराष्ट्र द्वेष. मराष्ट्राचा शेतकरी, गुरं, जनावरं तडफडून मेली पाहिजेच असं मोदी शाहांना वाटत आहे. गुजरातची कांदा निर्यातबंदी उठवण्यामागची भूमिका मोदींची तीच आहे. इकडचा शेतकरी तडफडत मेला पाहिजे पण गुजरातचा शेतकरी जगला पाहिजे. नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे तर गुजरातचे पंतप्रधान आहेत," अशी टीका संजय राऊत यांनी केली.

शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून ठाकरेंना पचनी पडत नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यावरही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. "कोण शेतकऱ्याचा मुलगा? महाराष्ट्रातल्या साडेआठ कोटी शेतकऱ्यांना या शेतकऱ्याच्या मुलाप्रमाणे दोन हजार एकर जमीन द्या आणि शेतात उतरण्यासाठी पाच हेलिकॉप्टर द्या असं माझं देवेंद्र फडणवीसांना आवाहन आहे," असेही संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :onionकांदाSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात