शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ३५ हजार कोटी भरपाईपोटी द्यावेत - राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 16:07 IST

Raju Shetti: केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून केंद्र शासनाने ३५ हजार कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देआम्ही राज्य शासनाला पाठिंबा दिला असला तरी शेतक-यांच्या प्रश्नावर लढायचे सोडणार नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.

सांगली : राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे सुमारे ५0 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून १५ हजार कोटी तर केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून केंद्र शासनाने ३५ हजार कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, राज्यात गत आठवड्यात झालेल्या पावसाने सर्वच विभागातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी. गतवेळी भाजपा सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना हेक्टरी २५ हजाराची मदत करण्याची मागणी केली होती. आता ते मुख्यमंत्री असल्याने त्यांनी या मागणीची अंमलबजावणी करावी.

राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. शेतक-यांचे सलग दोन वर्षे नुकसान झाले असून हा जागतिक तापमान वाढीचा परिणाम आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्टÑीय स्तरावरही आपत्ती निवारण फंड तयार करावा. त्यामुळे शेतक-यांना अधिक न्याय मिळू शकेल. आम्ही राज्य शासनाला पाठिंबा दिला असला तरी शेतक-यांच्या प्रश्नावर लढायचे सोडणार नाही, असे ते म्हणाले.

तरीही परिषद घेणारराज्य शासनाकडे आम्ही येत्या २ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूरला ऊस परिषद घेणार असल्याची माहिती दिली आहे. परवानगीची मागणी केली असून परवानगी न मिळाल्यास परिषद घेणारच. कोरोना काळातील सर्व नियम पाळून आम्ही परिषद घेण्यास तयार आहोत, असे शेट्टी म्हणाले.

भाजपाला पाठिंबा पण, केंद्राकडेही मदत मागाराज्य शासनाकडे नुकसानभरपाईची भाजपाने केलेल्या मागणीस आमचा पाठिंबा असून केंद्राकडेही त्यांनी याबाबत पाठपुरावा करावा, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

रस्त्यावर उतरण्याची तयारीशेतक-यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून आम्ही प्रसंगी रस्त्यावरंची लढाई लढू. ही लढाई होऊ नये म्हणून राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, असे शेट्टी म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीSangliसांगली