शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ३५ हजार कोटी भरपाईपोटी द्यावेत - राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 16:07 IST

Raju Shetti: केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून केंद्र शासनाने ३५ हजार कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देआम्ही राज्य शासनाला पाठिंबा दिला असला तरी शेतक-यांच्या प्रश्नावर लढायचे सोडणार नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.

सांगली : राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे सुमारे ५0 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून १५ हजार कोटी तर केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून केंद्र शासनाने ३५ हजार कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, राज्यात गत आठवड्यात झालेल्या पावसाने सर्वच विभागातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी. गतवेळी भाजपा सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना हेक्टरी २५ हजाराची मदत करण्याची मागणी केली होती. आता ते मुख्यमंत्री असल्याने त्यांनी या मागणीची अंमलबजावणी करावी.

राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. शेतक-यांचे सलग दोन वर्षे नुकसान झाले असून हा जागतिक तापमान वाढीचा परिणाम आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्टÑीय स्तरावरही आपत्ती निवारण फंड तयार करावा. त्यामुळे शेतक-यांना अधिक न्याय मिळू शकेल. आम्ही राज्य शासनाला पाठिंबा दिला असला तरी शेतक-यांच्या प्रश्नावर लढायचे सोडणार नाही, असे ते म्हणाले.

तरीही परिषद घेणारराज्य शासनाकडे आम्ही येत्या २ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूरला ऊस परिषद घेणार असल्याची माहिती दिली आहे. परवानगीची मागणी केली असून परवानगी न मिळाल्यास परिषद घेणारच. कोरोना काळातील सर्व नियम पाळून आम्ही परिषद घेण्यास तयार आहोत, असे शेट्टी म्हणाले.

भाजपाला पाठिंबा पण, केंद्राकडेही मदत मागाराज्य शासनाकडे नुकसानभरपाईची भाजपाने केलेल्या मागणीस आमचा पाठिंबा असून केंद्राकडेही त्यांनी याबाबत पाठपुरावा करावा, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

रस्त्यावर उतरण्याची तयारीशेतक-यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून आम्ही प्रसंगी रस्त्यावरंची लढाई लढू. ही लढाई होऊ नये म्हणून राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, असे शेट्टी म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीSangliसांगली