शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट; द्राक्षबागा, ज्वारी, हरभरा आडवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 06:38 IST

Rains : सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही ज्वारी, हरभरा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, ज्वारी व कडबा काळा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर/औरंगाबाद :  बुधवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने राज्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांना फटका बसला. सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह आंबा व झेंडूचीही हानी झाली आहे. तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्याने चार द्राक्षबागा कोसळून सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाले. सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही ज्वारी, हरभरा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, ज्वारी व कडबा काळा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

मराठवाड्यात नुकसानमराठवाड्यातील काही भागात गारांसह जोरदार पाऊस झाला. रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात देवठाणा, कांदेवाडीसह इतर गावांमध्ये बुधवारी मध्यरात्री गारांसह जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या परिसरातील संपूर्ण शेती पांढरीशुभ्र झाली. सर्वत्र गारांचे खच साचले होते. 

विदर्भाला तडाखाविदर्भातही पावसाने तडाखा दिला. नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती जिल्ह्यात गारपीट झाली.  हरभरा, गहू, कापूस, संत्रा, मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नाशिकला अवकाळीचा फटकानाशिक जिल्ह्यालाही अवकाळीचा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळसह नवापूर तालुक्यात गारपीट झाली. 

आजही पावसाची शक्यता शुक्रवारी पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 

कुलू-मनाली नव्हे, चिखलदरामेळघाटातील खंडूखेडा परिसरात झालेल्या गारपिटीने सिमला, कुलू-मनालीची आठवण झाली. चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम भागासह चुनखडी, घाना, भुतरुम, बिच्छूखेडा परिसरात गुरुवारी दुपारनंतर गारपीट झाली. 

वीज पडून चौघांचा मृत्यूनागपूर जिल्ह्यात भिवापूर तालुक्यातील पेंढराबोडी आणि कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथे वीज पडून सचिन रामाजी सहारे (३५) व अमोल नारायण काखे (२५) यांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात आनंदराव श्यामराव चव्हाण (रा. चिंचखेड, ता. किनवट), माधव दिगंबर वाघमारे (रा. मौजे सुजलेगाव, ता. नायगाव) यांचा वीज पडून मृत्यू झाला.  

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र