शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

खत खरेदीसाठी विचारतात जात, विरोधक संतप्त; उल्लेख वगळण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 05:35 IST

खताच्या ऑनलाईन खरेदीमध्ये शेतकऱ्यांना जात विचारल्याचे संतप्त पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले.

मुंबई : खताच्या ऑनलाईन खरेदीमध्ये शेतकऱ्यांना जात विचारल्याचे संतप्त पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. विरोधकांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत सरकारला जाब विचारला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खत खरेदी करताना पीओएस मशीनमधील जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाला पत्र पाठविल्याचे सांगितले.

 सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित करत जातीवाद निर्माण करणाऱ्या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. शेतकरी हीच आमची जात आहे. खत खरेदीसाठी जात का विचारताय असा सवाल त्यांनी तसेच जयंत पाटील यांनी केला.

जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये, असेही अजित पवार यांनी खडसावून सांगितले. शेतकऱ्यांना जात सांगण्याची गरज नसल्याची स्पष्टोक्ती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या प्रोग्रामिंगमध्ये कदाचित अनवधानाने ही माहिती समाविष्ट झाली असेल, असे ते म्हणाले.

पॉस मशिन...खतांची ऑनलाइन विक्री करण्याचे आदेश सरकारने दिले. शेतकऱ्यांना खत हवे असेल तर पॉस मशीनवर संपूर्ण माहिती भरूनच विक्री करावी लागते. त्यानंतर अंगठ्याचा ठसा उमटवावा लागतो. आता ही माहिती भरत असतानाच खताची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याची जात कोणती ही माहितीही भरावी लागत आहे.

बदल करण्याची सूचना करू :  शिंदेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकरी रासायनिक खत खरेदी करताना ऑनलाईन माहिती भरली जात आहे. हे डीबीटी पोर्टल केंद्र शासनाचे असून यासंदर्भात लवकरच केंद्र सरकारकडे पत्र व्यवहार करुन यात बदल करण्याची सूचना करणार आहे. 

पवार यांनी मांडले आकडेअजित पवार यांनी शेतकरी आत्महत्येचे आकडे समाेर ठेवले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (२०१४ ते २०१९) असताना ५,०६१ तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना १,६६० शेतकरी आत्महत्या झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात १,०२३ आत्महत्या झाल्या.

कर्ज २ कोटी, व्याज ८ कोटी : अशोक चव्हाणनांदेड जिल्ह्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून घेतलेल्या २ कोटी रुपयांच्या कर्जावर आता ८ कोटींचे व्याज लागले असून शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आली आहे. हे कर्ज व व्याज तातडीने माफ करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. पाण्यासाठी सोसायटीने कर्ज घेतले होते. मात्र पाणीच मिळाले नाही. 

ही धक्कादायक बाब शेतकऱ्यांना रासायनिक खते खरेदी करताना ई-पॉस मशिनमध्ये जात नमूद करावी लागत आहे. ही धक्कादायक बाब असून, यापूर्वी असे घडले नव्हते.     शरद पवार

शेतकऱ्याला जात नसते, सर्वांना अन्न पुरवणारा तो अन्नदाता आहे परंतु खत खरेदी करताना जात विचारली जात आहे हे दुर्दैव आहे. भाजपाच्या राजवटीत शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. नाना पटोले

सरकार वर्णभेदासाठी किती आग्रही आहे हे सरकारच्या भूमिकेतून दिसते.जयंत पाटील

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेFarmerशेतकरी