शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मराठा तरुणांच्या हितासाठी ‘सारथी’मार्फत उपक्रम राबवा; प्रतिक पाटलांची अजित पवारांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 20:57 IST

Pratik Patil : आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या 'सेवासदन' या शासकीय निवासस्थानी आले असता प्रतिक जयंत पाटील यांनी निवेदन दिले.

मुंबई - सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील युवक-युवतींच्या हितासाठी नवीन उपक्रम राबविण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन प्रतिक जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे चिरंजीव प्रतिक जयंत पाटील सध्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत असल्याचे चित्र आहे. 

आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या 'सेवासदन' या शासकीय निवासस्थानी आले असता प्रतिक जयंत पाटील यांनी निवेदन दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 'सारथी' संस्था ही मराठा समाजातील युवक-युवतींच्या सर्वांगिण विकासासाठी अत्यंत उत्कृष्ट कार्य करत आहे. मात्र या संस्थेच्या माध्यमातून अधिक नवे उपक्रम राबवले जाऊ शकतात असे मत प्रतिक जयंत पाटील यांनी व्यक्त केले. 

शिक्षण प्रशिक्षण, कौशल्य विकास या त्रिसुत्रीच्या आधारे सारथीने काम केल्यास मराठा समाजातील युवक - युवतीच्या विकासासाठी मोठे काम होईल, असे प्रतिक पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. 

प्रतिक जयंत पाटील यांनी निवेदनात मांडलेल्या महत्त्वाच्या काही सूचना... 

१. सारथीतर्फे मराठा समाजातील युवक- युवतींना IIT व IIM या जागतिक दर्जाच्या भारतीय शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेशासाठी विशेष प्रशिक्षणाचे कोर्सेस आयोजित करावेत. त्यासाठी शालेय पातळीपासूनच प्रबोधन करता येईल. 

२. दहावी-बारावीच्या गुणांवर पुढील प्रवेश अवलंबून असल्याने दहावी - बारावीतील गुण अधिक असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मराठा समाजातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरु करावेत. 

३. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी, जर्मन, फ्रेंच इत्यादी भाषांचे वर्ग सुरु करणे. 

४. इतर व्यावसायिक कौशल्ये जसे की सुतारकाम, प्लंबर, इत्यादीचे प्रशिक्षण वर्ग सुरु करणे. 

५. जागतिक दर्जाच्या विद्यापीठात शिकण्यासाठी मराठा समाजाच्या शंभर विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देणे. 

६. मराठा समाजातील पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना विशेष प्रोत्साहनपर भत्ता सुरु करणे. 

७. मराठा समाजातील उद्योगपतीचा एक सेतू उभारून व्यवसायभिमुक कौशल्ये विकसित होण्यासाठी केंद्र सुरु करणे. 

८. मराठा समाजातील मुला- मुलींसाठी पुणे, मुंबई व दिल्ली येथे हॉस्टेल्स उभारणे. 

९. मराठा समाजातील भूमिहीन व अल्पभूधारक व्यक्तींच्या पाल्यांचा डाटा जमा करून ते शिक्षणाच्या मूळ प्रवाहाबाहेर फेकले जात नाहीयेत, याचे ट्रॅकिंग करणे, व शिक्षणाच्या मूळ प्रवाहाबाहेर गेलेल्या मुला- मुलींना प्रवाहात आणणे. 

१०. जीवनाच्या विविध क्षेत्रात जागतिक व राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या व्यक्तींचे सारथीसाठी सल्लागार मंडळ स्थापन करून वेळोवेळी नवीन धोरणे ठरवून अंमलात आणणे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliticsराजकारणmarathaमराठाMumbaiमुंबई