शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मोठा खुलासा! ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी 'कॅप्टन' खरातला दिले; कोणी, कसे, का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 09:49 IST

Captain Ashok Kharat News: सिन्नरच्या श्री शिवनिका संस्थानला दारणा धरणातून ३९ लाख लिटर पाणी मंजूर. उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील निर्णयावरून वाद. पाहा काय आहे तो शासन निर्णय आणि संपूर्ण प्रकरण.

सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थान या न्यासाला दारणा धरणातून पाणी आरक्षित करून देण्याचा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा निर्णय आता वादाच्या भोऱ्यात सापडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात झालेल्या या निर्णयामुळे 'शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी' एका खासगी संस्थेला वळवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप होत आहे.

३१ जुलै २०२० रोजी जलसंपदा विभागाने एक शासन निर्णय (GR) निर्गमित केला होता. यानुसार, सिन्नरच्या श्री शिवनिका संस्थानला दारणा धरणाच्या गोदावरी प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आले. विशेष म्हणजे, हा प्रस्ताव २५ जून २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. कोरोना काळात हे पाणी नराधम कॅप्टन अशोक खरातच्या संस्थेसाठी वळविण्यात आले होते. 

३९ लाख लिटर पाण्याचे आरक्षणया निर्णयानुसार, संस्थानला ०.००३९ दलघमी (सुमारे ३९ लाख लिटर) इतका बिगर सिंचन पाणी हक्क मंजूर झाला आहे. हे पाणी दारणा धरण आणि गोदावरी उजवा तट कालव्याच्या ४८ व्या किलोमीटरवरून उचलण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कॅप्टन खरात याचा दबदबा?या संस्थानचे अध्यक्ष असलेल्या कॅप्टन अशोक खरात यांचा मंत्रालयातील दबदबा या निर्णयामागे असल्याचे बोलले जात आहे. ज्या काळात शेतकरी सिंचनासाठी पाण्यासाठी संघर्ष करत होते, त्याच काळात एका खासगी संस्थानला इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आरक्षित करून दिल्याने आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

अटी आणि शर्तींचे काय?शासनाने हा निर्णय देताना सिंचन पुनर्स्थापनेचा खर्च संस्थानने करणे आणि प्रदूषण रोखणे यांसारख्या अटी घातल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष जमिनीवर या अटींचे पालन झाले की नाही, याबाबत स्थानिक स्तरावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray Govt Gave Farmers' Water to Captain Kharat: Who Enabled It?

Web Summary : The Uddhav Thackeray government's decision to allocate water from Darna Dam to Shree Shivanika Sansthan, a private trust, is under scrutiny. Allegations arise that farmers' water rights were diverted during the pandemic, raising questions about influence and adherence to stipulated conditions.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी