शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

...म्हणून कुणाला शहरी नक्षलवादी म्हणणे योग्य ठरणार नाहीः गृहमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 14:48 IST

कोरेगाव-भीमा प्रकरणावर गृहमंत्र्यांचं भाष्य

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मी लवकरच बैठक घेईन आणि विस्तृत आढावा घेऊनच सरकारची भूमिका मांडेन. आधीच्या सरकारच्या भूमिकेविरुद्ध वेगळी मतं मांडली म्हणून कोणाला शहरी नक्षलवादी म्हणणं योग्य ठरणार नाही असं मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मांडलं. ते पत्रकारांशी बोलत होते.कोरेगाव-भीमा प्रकरणात शहरी नक्षलवाद्यांचा सहभाग होता का याची अन्य मुद्द्यांप्रमाणे चौकशी सुरू आहे. चौकशीअंती नेमकी वस्तुस्थिती समोर येईल असे देशमुख म्हणाले. कोरेगाव भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आपण कोणतंही विधान माध्यमांमध्ये केलेलं नाही. मात्र काही विशिष्ट माध्यमांनी काही विधानं माझ्या तोंडी घातली, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. जेएनयूमधील हिंसाचाराची घटना अत्यंत दुर्दैवी होती, असं देशमुख म्हणाले. या घटनेच्या निषेधार्थ गेटवे ऑफ इंडियावर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी एका तरुणीच्या हातात फ्री कश्मीर असा फलक असल्यानं तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पत्रकारांनी विचारलं असता देशमुख यांनी स्पष्ट केलं की त्या तरुणीनं पोलिसांना दिलेल्या जबानीतून तिचा उद्देश राष्ट्रद्रोहाचा नव्हता असं प्राथमिकदृष्ट्या दिसतं. काश्मीरमध्ये अजूनही मोबाईल, इंटरनेट सेवा सुरळीत नाही. नेत्यांना नजरकैदेत ठेवलं आहे. या परिस्थितीतून काश्मीर मुक्त करावं या भूमिकेतून तिनं फ्री काश्मीरचा फलक हाती धरला होता, असं तिचं म्हणणे आहे. याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. सर्व माहिती घेऊन तिच्यावरील कारवाई संदर्भात फेरविचार केला जाईल असं देशमुख यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारAnil Deshmukhअनिल देशमुख