शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

अद्याप सांगलीत उमेदवारांनी अर्ज भरला नाही, काँग्रेस-शिवसेनेत खूप काही होऊ शकते; जयंत पाटलांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 19:40 IST

Jayant Patil On Sangli Loksabha Candidate Issue: सांगलीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होत्या. त्या चर्चा सुरू असताना आम्ही येऊन बोलणे योग्य नव्हते. - जयंत पाटील

सांगलीतकाँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी आज अपक्ष अर्ज भरला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सांगलीत परस्पर उमेदवार दिल्याने पाटील समर्थक नाराज झाले असून बंडखोरी करण्याची भुमिका काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. यावरून आता जयंत पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भुमिका स्पष्ट केली आहे. 

सांगलीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होत्या. त्या चर्चा सुरू असताना आम्ही येऊन बोलणे योग्य नव्हते. सांगलीची जागा काँग्रेस आणि शिवसेनेने मागितली होती. शरद पवारांपासून आम्ही सर्वांनी काँग्रेसला जागा मिळावी, तोडगा निघावा यासाठी प्रयत्न केले. पेटवणारे पेटवत असतात काहींचा यामागे हेतू वेगळा असतो. पेटवणारे एकदा एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये आले की अवघड होते. मी विशाल पाटील यांच्या संपर्कात आहे, असे शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. 

सांगलीचा तिढा सुटला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी हा विषय बसून संपवावा. ज्यावेळी हा वाद सुरू होता त्यावेळी शरद पवार आणि मी स्वतः वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. अजून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज भरला नाही. त्यांच्यात खूप काही होऊ शकते. अर्ज मागे घेण्यापर्यंत वेळ आहे, असे संकेत पाटलांनी दिले. 

माझ्या बद्दल बऱ्याचवेळा काही लोकांनी अपप्रचार केला. महाविकास आघाडीत आम्ही एकत्र बसलो. जागा वाटपात अनेक मतमतांतरे झाली. मलाच काही गोष्टींसाठी जबाबदार धरणे योग्य नाही. मग त्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा जबाबदार धरले पाहिजे. माझा त्याच्याशी काय संबंध? जुन्या वादाला काही लोक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारण करताना पुढला विचार करायचा असतो. राज्य स्तरावर जो निर्णय झाला तो मान्य करून पुढे जायचे असते. या संबंधात जे लोक वावड्या उठवतात त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे की त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते काय करतात, असे पाटील म्हणाले.  

तसेच राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील हे वरती एकत्रित बसून चहा घेत असतील आणि म्हणत असतील हे काय चालले आहे. आपण एकमेकांना सांभाळून राजकारण केले. समजूतदार राजकारणी होते दोघे. मागे ४० वर्षांपूर्वी काय झाले याच्याशी काही घेणे देणे नाही. इतिहासावर बोलून भविष्याकडे लक्ष जात नाही, असा सल्लाही पाटलांनी दिला. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलvishal patilविशाल पाटीलsangli-pcसांगलीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस