शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं बाळासाहेबांचा अपमान"; बावनकुळे म्हणाले, "अमित शाह योग्यच बोलले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:48 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Amit Shah on Uddhav Thackeray: शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या एकदिवसीय अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांनी १९७८ मध्ये सुरू केलेले आणि उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये केलेले विश्वासघाताचे राजकारण महाराष्ट्रातील मतदारांनी जमिनीखाली २० फूट गाडून टाकले, असं म्हणत अमित शाह यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान असल्याची प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शाह योग्यच बोलले असल्याचे म्हटलं आहे.

शिर्डी येथील भाषणात अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी २०१९ ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली. १९७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु होतं. ते जनतेने संपवून दाखवलं, अशी टीका अमित शाह यांनी केली. यानंतर अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना दगाबाज करुन बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केल्याचे राऊत यांनी म्हटलं.

"उद्धव ठाकरेंनी  दगाफटका केलेला नाही. भाजपाने गद्दारीला खतपाणी घालण्याचं काम अमित शाह आणि मोदींनी केलं आहे. आता तेच अमित शाह बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शाह हे योग्य बोलले असल्याचे म्हटलं.

"अमित शाह असं म्हणाले की फोडाफोडीचे राजकारण या महाराष्ट्रामध्ये १९७८ पासून सुरू होतं. मधल्या काळात २०१९ मध्ये फोडाफोडीच्या राजकारणाने महाराष्ट्राच्या जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आमच्याशी दगा फटका केला आणि तो महाराष्ट्राला सहन झाला नाही.  म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा २०२४ चे सरकार देताना स्थिर आणि मजबूत सरकार दिलं. आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठे बहुमत महाराष्ट्राच्या जनतेने का दिल याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीने ज्याप्रकारे फोडाफोडीचं राजकारण केलं त्यामुळे जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार विकसित करण्यासाठी महाराष्ट्रासाठी जनतेने आम्हाला साथ दिली," असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

"अमित शाह यांच्या कालच्या भाषणात एक दिशा होती. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत बेईमानी केली दगाफटका केला मग ते उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सर्वांना जे अमित शाह बोलले ते योग्यच बोलले आहेतय त्यांनी तसं केलं म्हणून अमित शहा यांनी तसे शब्द वापरले आहेत," असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाहSanjay Rautसंजय राऊतChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे