शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

"उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं बाळासाहेबांचा अपमान"; बावनकुळे म्हणाले, "अमित शाह योग्यच बोलले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:48 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Amit Shah on Uddhav Thackeray: शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या एकदिवसीय अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांनी १९७८ मध्ये सुरू केलेले आणि उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये केलेले विश्वासघाताचे राजकारण महाराष्ट्रातील मतदारांनी जमिनीखाली २० फूट गाडून टाकले, असं म्हणत अमित शाह यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान असल्याची प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शाह योग्यच बोलले असल्याचे म्हटलं आहे.

शिर्डी येथील भाषणात अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी २०१९ ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली. १९७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु होतं. ते जनतेने संपवून दाखवलं, अशी टीका अमित शाह यांनी केली. यानंतर अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना दगाबाज करुन बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केल्याचे राऊत यांनी म्हटलं.

"उद्धव ठाकरेंनी  दगाफटका केलेला नाही. भाजपाने गद्दारीला खतपाणी घालण्याचं काम अमित शाह आणि मोदींनी केलं आहे. आता तेच अमित शाह बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शाह हे योग्य बोलले असल्याचे म्हटलं.

"अमित शाह असं म्हणाले की फोडाफोडीचे राजकारण या महाराष्ट्रामध्ये १९७८ पासून सुरू होतं. मधल्या काळात २०१९ मध्ये फोडाफोडीच्या राजकारणाने महाराष्ट्राच्या जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आमच्याशी दगा फटका केला आणि तो महाराष्ट्राला सहन झाला नाही.  म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा २०२४ चे सरकार देताना स्थिर आणि मजबूत सरकार दिलं. आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठे बहुमत महाराष्ट्राच्या जनतेने का दिल याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीने ज्याप्रकारे फोडाफोडीचं राजकारण केलं त्यामुळे जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार विकसित करण्यासाठी महाराष्ट्रासाठी जनतेने आम्हाला साथ दिली," असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

"अमित शाह यांच्या कालच्या भाषणात एक दिशा होती. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत बेईमानी केली दगाफटका केला मग ते उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सर्वांना जे अमित शाह बोलले ते योग्यच बोलले आहेतय त्यांनी तसं केलं म्हणून अमित शहा यांनी तसे शब्द वापरले आहेत," असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाहSanjay Rautसंजय राऊतChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे