शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

असे आंदोलन करा की सरकारला..., जिथे गरज लागेल मला बोलवा; राज ठाकरेंचे आदेश निघाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 13:31 IST

Raj Thackeray Speech: पक्ष म्हणून आता तुम्हाला सर्वांना या आंदोलनामध्ये उतरावे लागणार आहे. पनवेलपासून ते सावंतवाडीपर्यंत तुम्हाला काम करावे लागणार आहे. - राज ठाकरे

रस्ते बांधायला १५-१७ वर्षे लागतात का, समृद्धी महामार्ग चार वर्षांत होतो. मग कोकणातचे खासदार आमदार काय करतायत कोण बोलतेय गडकरींशी, काय करतात हे लोक, असा सवाल करत राज ठाकरेंनीमनसे कार्यकर्त्यांना मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून आंदोलन करण्याचे आदेश दिले. 

चंद्रयान तिकडे खड्डेच पाहणार आहे, महाराष्ट्रात सोडले असते...; राज ठाकरेंचा मिश्किल टोला

दरडी कोसळतायत, त्यात माणसे जातायत. अमेरिकेच एम्पायर इस्टेट बिल्डिंग चौदा महिन्यात बांधली गेली. इकडे १४-१४ वर्षे लागतायत. दुसऱ्या महायुद्धानंतर मंदी आली तेव्हा लोकांमध्ये पैसे तर गेले पाहिजेत. त्यांनी सर्वात आधी रस्ते बांधायला काढले. ते जे सरळ रस्ते दिसतात ते तेव्हा बांधलेले आहेत. तिथेही लोकांनी विरोध केला. तिथल्या राज्यकर्त्याने म्हटले होते की आजची अमेरिकेची पिढी मला शाप देईल, परंतू भविष्य़ातल्या सगळ्या पिढ्या मला आशिर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. गडकरींनी सांगितलेले की हवेत उडणाऱ्या बसेस आणणार, लवकर आणा. कोणाच्या डोक्यात काय येईल सांगता येत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली. 

पक्ष म्हणून आता तुम्हाला सर्वांना या आंदोलनामध्ये उतरावे लागणार आहे. पनवेलपासून ते सावंतवाडीपर्यंत तुम्हाला काम करावे लागणार आहे. आपल्याला लोकांना त्रास द्यायचा नाहीय. पण आंदोलन असे झाले पाहिजे की सरकार हलले पाहिजे. लवकरात लवकर रस्ता झाला पाहिजे. तुमचे कोकणावर लक्ष असले पाहिजे. कोण जमिनी पळवतेय ते पहा, कोकणात उद्योग आले पाहिजेत, परंतू, सौदर्य राखून आले पाहिजे. असा प्रदेश सहसा मिळत नाही. परमेश्वराने महाराष्ट्रावर कृपा केलेली आहे. असे आंदोलन करा की सरकारला अशा प्रकारचे आंदोलन झाले होते अशी भीती वाटली पाहिजे. जिथे माझी गरज लागेल तिथे मला बोलवा, असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले. 

मुंबई-गोवा हायवेवर किती खर्च...२००७ साली या रस्त्याचे काम सुरु झाले. काँग्रेसचे सरकार गेले शिवसेना भाजपाचे सरकार आले त्यानंतर कोणा कोणाचे सरकार आले. या खड्ड्यांतून जात असताना त्याच त्य़ाच पक्षातील लोकांना कसे मतदान करता याचे आश्चर्य वाटतेय. खड्ड्यातून गेलो आणि मेलो काय? असा सवाल राज यांनी मतदारांना विचारला. मुंबई गोवा महामार्गावर १५५६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. रस्ता झालेला नाही. बाकीच्यांच्या तुंबड्या भरल्या. नितीन ग़डकरींना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितले की मी घातले लक्ष पण कंत्राटदार पळून गेले, काही कोर्टात गेलेत. यामागे कोणाचे काही काम तर सुरु नाहीय ना? कोकणातल्या जमिनी आहेत त्या धडाधड परप्रांतीयांच्या घशात गेल्या आहेत. नाणार रद्द होतोय हे पाहून बारसू सुरु झाले. भोळसट कोकणी बांधव चिरीमिरीसाठी विकून मोकळा होतोय. पाच हजार एकर जमिन कधी एकत्र पाहिलीय का? कुंपणच शेत खातेय, आपलीच लोक आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.   

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे