शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Eknath Shinde Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; तीन दिवसांत शपथविधी? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 06:41 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी विस्ताराने चर्चा झाली. भाजप व शिंदे गटात मंत्रिपदाच्या वाटपाचा फॉर्म्युलादेखील ठरला, तरी विस्ताराचा पत्ता नाही, अशी स्थिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी होणाऱ्या सुनावणीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला गती येणार असून, येत्या दोन ते तीन दिवसांत विस्ताराला मुहूर्त लागेल, अशी शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनला शपथ घेतली होती. त्यानंतर ३३ दिवस उलटले तरी विस्तार झालेला नाही. गेल्या महिनाभरात वीसेक मुहूर्त सांगितले गेले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाच दिल्ली वाऱ्याही झाल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी विस्ताराने चर्चा झाली. भाजप व शिंदे गटात मंत्रिपदाच्या वाटपाचा फॉर्म्युलादेखील ठरला, तरी विस्ताराचा पत्ता नाही, अशी स्थिती आहे.

सर्वोच्च न्यायालयातील १ ऑगस्टच्या सुनावणीनंतर विस्तार केला जाईल, असे म्हटले जात होते. ही सुनावणी आता ३ ऑगस्टला होत आहे. सुनावणीत शिंदे सरकारला दिलासा मिळाला तर विस्ताराच्या हालचाली गतिमान होतील. भाजपच्या एका ज्येष्ठ आमदाराने सांगितले, की काही जणांना मुंबईतच थांबायला सांगितले आहे.राज्य मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या ४२ आहे; पण पहिल्या टप्प्यात भाजपच्या आठ आणि शिंदे गटाच्या पाच आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी विस्ताराने चर्चा झाली. भाजप व शिंदे गटात मंत्रिपदाच्या वाटपाचा फॉर्म्युलादेखील ठरला, तरी विस्ताराचा पत्ता नाही, अशी स्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच विधिमंडळाचे छोटेखानी पावसाळी अधिवेशन घेतले जाईल व ऑगस्टअखेर दुसऱ्या टप्प्याचा विस्तार केला जाईल, असे मानले जाते. परंतु विरोधक मात्र यावर समाधानी नाहीत. त्यांनी यावरून सरकारला घेरणे सुरुच ठेवले आहे. 

दिल्लीतून सिग्नल नाही, की मंत्री ठरवता येत नाहीत : अजित पवार  राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी दिल्लीहून सिग्नल मिळत नाही की इच्छुक आमदारांची संख्या अधिक असल्याने अडचण आहे? किती दिवस दोघांचे मंत्रिमंडळ चालविणार, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्र परिषदेत केला.ते म्हणाले की, महिना उलटला तरी विस्तार होत नाही. मंत्रिमंडळ बैठक आहे. दोघेच मंत्रिमंडळ बैठक घेणार. उरलेल्या ४० खुर्च्या त्यांच्याकडे बघत बसणार.  मुख्यमंत्र्यांकडे सर्व खात्याचे अधिकार आहेत. उपमुख्यमंत्र्यांना खातेच दिलेले नाही.  प्रत्येक फाईल मुख्यमंत्र्यांकडे जात आहे. मात्र, सहीअभावी फाइली थांबल्या आहेत. सह्या करायला मुख्यमंत्र्यांना वेळच नाही. उपमुख्यमंत्र्यांना अधिकारच दिलेला नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय