शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

Cabinet Expansion: 'संजय राठोड यांच्या विरोधात ज्यांनी आंदोलन केले, त्यांनीच आता...', जयंत पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 16:02 IST

'मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा आणि कोणाचा नाही, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो. जे मंत्री झाले, त्यांनी चांगले काम करावे.'

मुंबई: महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्याच्या एका महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. भाजपच्या 9 आणि शिंदे गटाच्या 9 मंत्र्यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावर विरोधी विविध प्रतिक्रिया येत आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या मंत्रिमंडळ विस्तारावरुन सरकारला टोला लगावला आहे.

'राज्यातील जनता बेजार झाली होती'माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, 'सरकार स्थापन होऊन एका महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला, पण आता मंत्रिमंडळ विस्तार झाला. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. चाळीस दिवसांपासून राज्यातील जनता बेजार झाली होती. राज्यात सरकार माय बाप नाही अशी भावना होती. आता तरी सरकारने शासकीय यंत्रणा कार्यरत करावी', असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

'आम्ही कुणालाही क्लिनचीट दिली नाही'ते पुढे म्हणाले की, 'मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा आणि कोणाचा नाही, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो. त्यांनी आता निर्णय घेतला आहे. जे मंत्री झाले, त्यांनी चांगले काम करावे. संजय राठोड यांच्या विरोधात भाजपनेच आंदोलन केले, पण आता त्यांनीच राठोड यांना सरकारमध्ये घेतले आहे. आम्ही महाविकास आघाडी काळात कुणालाही क्लिनचीट दिली नाही. आम्ही अशी घाई केली नाही, असा खुलासाही जयंत पाटलांनी केला.

'संजय राठोडांना मंत्री केल्याचा मनापासून आनंद'दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर आनंद व्यक्त केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'संजय राठोड महाविकास आघाडीत मंत्री असताना आम्ही सातत्याने सांगत होतो की, त्यांच्यावर अन्याय होतोय. मात्र, भाजपने कोणतेही भान न ठेवता राळ उठवली होती. बेछूट आरोप केले होते. मात्र, त्या आरोपांचे नंतर काय झाले, असा सवाल उपस्थित करत आता संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्याचा मला मनापासून आनंद होत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा