शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 12:54 IST

पक्षाचे आज जे हाल झालेत, त्यात जेवढे काही उमेदवार पडले असतील तर त्यामागे नाना पटोलेंचा हात आहे असा आरोप बंटी शेळके यांनी केला. 

मुंबई - नाना पटोले अजूनही आरएसएसशी जोडले आहेत. त्यातूनच त्यांनी निवडणुकीचं काम केले. प्रियंका गांधी आल्यानंतरही राज्यातील काँग्रेस संघटनेचा कुणी पदाधिकारी तिथे नसेल तर त्याची जबाबदारी कुणी घेतली पाहिजे? पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या माध्यमातून मला पक्षाचं चिन्ह मिळालं, पण माझ्या मतदारसंघात मोजकेच पदाधिकारी वगळता कुणीही प्रचाराला आलं नाही. चिन्ह पक्षाने दिले तरी एकप्रकारे मला अपक्षच ही निवडणूक लढावी लागली असं सांगत नागपूर मध्यचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

मुंबईत आज काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीत बंटी शेळके यानी थेट नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बंटी शेळके म्हणाले की, गेल्या निवडणुकीतही हेच झाले. संघटनेने आम्हाला पाठबळ दिले नाही. अवघ्या ४ हजार मतांनी मागील निवडणुकीत माझा पराभव झाला. यावेळी पक्षश्रेष्ठींकडून नेमण्यात आलेल्या उमेदवारांच्या स्क्रिनिंग कमिटीत माझे नावही नव्हते. पक्षश्रेष्ठींचे किती प्रेम आहे ते दिसून आले. २०१९ पासून बंटी शेळकेला तिकिट मिळणार नाही असं वातावरण तयार करण्यात येत होते. त्यामुळे वातावरण निर्मिती झाली. माझा स्पष्ट आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आहे. मी आजपर्यंत कुणाची तक्रार केली नाही. बैठकीत नाना पटोले इतर नेत्यांसमोर मी माझं म्हणणं मांडलं असं त्यांनी माध्यमांना सांगितले.

तसेच पक्षाचे आज जे हाल झालेत, त्यात जेवढे काही उमेदवार पडले असतील तर त्यामागे नाना पटोलेंचा हात आहे. आजपर्यंत मी कुणाची तक्रार केली नाही. येणाऱ्या काही महिन्यात महापालिका निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांवर अन्याय व्हायला नको. ज्यांनी मेहनत केली आहे त्यांच्याकडे पक्षश्रेष्ठींचे लक्ष केंद्रीत झाले पाहिजे. राहुल गांधी यांच्या माध्यमातून मला यंदा तिकिट मिळाले. आम्ही मेहनत करतोय. राहुल गांधी यांच्या टीमकडून पडताळणी झाली पाहिजे. जर प्रियंका गांधी यांच्या रोड शोमध्ये काँग्रेस कार्यकर्ते इतक्या संख्येने नव्हते. शेळके कुटुंबाची ही निवडणूक नव्हती. काँग्रेसनं जो सर्व्हे केला होता त्यातून मला उमेदवारी मिळाली. नाना पटोलेंनी माझे नावही उमेदवार छाननी प्रक्रियेत दिले नाही. आज मी स्वत:च्या बळावर निवडणूक लढलो. हातावर मोजण्याइतके कार्यकर्ते प्रचारात होते, बाकीचे कुठे होते..? असा संतप्त सवाल बंटी शेळके यांनी उपस्थित केला.

दरम्यान, माझ्यावर राजकीय गुन्हे सर्वाधिक आहेत. प्रत्येक ठिकाणी मी आवाज उचलला आहे. राहुल गांधींनी म्हटलंय, अन्यायाविरोधात आवाज उचला. प्रियंका गांधी यांचा रोड शो झाला तिथे विरोधक आले त्यांच्यासमोर मी एकटा भिडलो. मी द्वेष केला नाही तर हात जोडले. आरोप प्रत्यारोप करत नाही जे वास्तव आहे ते मी मांडलंय असंही बंटी शेळके यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसnagpur-central-acनागपूर मध्यPriyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीNana Patoleनाना पटोलेRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ