शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

मालवणात सापडली बंपर तारली, समुद्राच्या लाटांसोबत किनारी : पर्यटकांसह, स्थानिकांची पाहण्यासाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 15:24 IST

कोकण किनारपट्टीवर चार दिवसांपूर्वी ओखी वादळाने मच्छीमारांच्या नाकी दम आणले होते. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर कोट्यवधी रूपयांचे नुकसान केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून हे वादळ शांत झाले.

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीवर चार दिवसांपूर्वी ओखी वादळाने मच्छीमारांच्या नाकी दम आणले होते. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर कोट्यवधी रूपयांचे नुकसान केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून हे वादळ शांत झाले. त्यामुळे मच्छीमारांनी सुटकेचा निश्वास सोडला. रविवारी मच्छीमारांनी पुन्हा नव्या उमेदीने मच्छीमारीस प्रारंभ केला.  त्याचदरम्यान, सकाळी मालवण किनारपट्टीवर तारली मासळी बंपर स्वरूपात आढळून आली. मोठ्या प्रमाणात तारली मासळी किनाऱ्यालगत लाटांसोबत येत असल्याने तिला पाहण्यासाठी आणि पकडण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी गर्दी केली होती.पर्यटकांसाठी मांदियाळी-मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत. हिवाळी हंगामात सिंधुदुर्ग पर्यटनासाठी महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची किनारपट्टी आहे. त्यामुळे मालवण, आचरा, कुणकेश्वर, भोगवे, निवती, वेंगुर्ले, शिरोडा, आरोंदा आदी महत्वाच्या बिचवर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. त्यातच सिंधुदुर्ग किल्ला हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण राहिले आहे.स्थानिक मालवणी भोजनाचा आस्वाद घेतानाच रविवारी  मालवणात प्रत्यक्षात मासळी पकडण्याची संधी मिळाल्याने पर्यटकांसाठी ही एक सुवर्ण संधीच ठरली.बंपर तारली हा ओखीचा परिणाम-ओखीच्या परिणामाने समुद्राच्या हालचाली बदलल्या त्यातूनच तारली सारखी मासळी किनाऱ्यावर येत असल्याचा अंदाज ज्येष्ठ मच्छिमार बांधवांनी व्यक्त केला.शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींची लगबग-सिंधुदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर, नयनरम्य भोगवे बिच आदी ठिकाणांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पश्चिम महाराष्ट्र, विर्दभ, मराठवाड्यातून शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येथे दाखल होत आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागात मोठी गर्दी होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार