शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020: शेतकऱ्यांचे वर्गीकरण करूनच योजना राबवाव्यात- पोपटराव पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 06:49 IST

असंघटित क्षेत्रातला शेतकरी हा सर्वांत मोठा घटक आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न योग्य पद्धतीने कोणी मांडत नाही.

-पोपटराव पवार

असंघटित क्षेत्रातला शेतकरी हा सर्वांत मोठा घटक आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न योग्य पद्धतीने कोणी मांडत नाही. ग्रामीण विकासाचा विचार करताना त्यात प्रामुख्याने शेतकरी आणि त्याच्याभोवतीचे घटक डोळ्यासमोर असले पाहिजेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात १६ कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. शेती, सिंचन व ग्रामीण विकास यांच्यासाठी एकत्रित तीन लाख कोटींची घोषणा केली आहे़ मात्र, शेती योजना राबविताना सरसकटीकरण टाळायला हवे़ शेतकºयांचे वर्गीकरण करून त्यानुसार योजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे़ पड जमिनीवर सोलर योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे़ मात्र, या योजनेत सुसूत्रीकरणाचा अभाव दिसतो.

केंद्र सरकारने सेंद्रिय खते, शेती क्षेत्रात गुंतवणूक, सोलर ऊर्जा, ग्रामपंचायती फायबर आॅप्टिक केबलने जोडणे, अशा विविध योजनांसाठी तरतूद केली आहे़ तसेच स्वच्छ भारत योजनेसाठी १२ हजार ३०० कोटींची तरतूद आहे़ स्वच्छ भारत योजनेची अंमलबजावणी करताना ही योजना वैयक्तिक लाभांशी जोडायला हवी. गावे फायबर ऑप्टीक केबलने जोडून सर्व योजनांचे लाभ गावातून मिळायला हवेत. त्यासाठी ग्रामपंचायती सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत सुरू राहायला हव्यात़ त्यासाठी कर्मचारी नेमण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना मिळायला हवेत़ त्यासाठी स्वतंत्र तरतूदही १५व्या वित्त आयोगात करायला हवी़ १५ व्या वित्त आयोगाचा निधी देताना पाच हजार लोकसंख्येचा निकष रद्द करायला हवा.

कुसुम सोलर पंप योजना राबविताना एजन्सीवर अवलंबून न राहता महावितरणला अधिकार मिळायला हवेत. शेतकऱ्यांना सोलरचा परतावा कसा मिळणार याची स्पष्टता यायला हवी़ या अर्थसंकल्पात मनरेगाची तरतूद करायला हवी होती़ ती दिसत नाही़ शेतकामाला मनरेगाशी जोडून शेतकºयांना थेट मजुरी, सर्व पिकांना हमीभावाची तरतूद या अर्थसंकल्पात अपेक्षित होती़ कृषी योजना राबविताना बारामाही व सहामाही बागायतदार, अवर्षणग्रस्त शेतकरी, कोरडवाहू शेतकरी, नोकरदार शेतकरी असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. 

ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करायला हवी होती़ छोट्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही, यासाठी तरतूद असायला हवी होती.शहरी भाग गृहीत धरून अर्थसंकल्प सादर केला जातो़ हा अर्थसंकल्प शेतीकेंद्रित असायला हवा.

यंदा अर्थसंकल्पात १६ कलमी कार्यक्रम, कुसुम योजना, रस्त्यांची तरतूद या बाबी चांगल्या आहेत़ अर्थसंकल्पातील तरतुदींची अंमलबजावणी व्हावी. अन्यथा, ‘नेहमीच येतो पावसाळा’, अशी त्याची अवस्था व्हायची़शेतमालाचे भाव वाढले की शहरी वर्गातून ओरड होते़ मात्र, भाव एका पिकाचे वाढतात तर इतर पिके तोट्यातच असतात. त्यावर कोणी बोलत नाही़ त्यामुळे सर्व शेतमालाला हमीभाव हवा़ त्यातून महागाईही आटोक्यात राहू शकते आणि शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळेल.

टॅग्स :budget 2020बजेटbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणFarmerशेतकरी