शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Budget 2020: संरक्षणासाठी तरतूद समाधानकारक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 06:29 IST

तणावाच्या परिस्थितीत शस्त्रसामग्रीखरेदीची गरज

जागतिक आणि आपल्या आसपासच्या देशांची स्थिती बघितली, तर सर्वत्र तणाव आहे. अशा वेळी भारतीय सैन्यासाठी मोठ्या प्रमाणात शस्त्रसामग्री खरेदी करण्याची गरज असताना प्रत्यक्षात मात्र अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या अंदाजपत्रकात त्यासाठी अजिबातच समाधानकारक तरतूद केलेली नाही.

सरकारने जाहीर केल्यानुसार ४० दिवस पूर्ण क्षमतेने पारंपरिक युद्ध करता येईल इतका शस्त्रसाठा असल्याचे जाहीर केले असले, तरी बदलल्या जागतिक सामरिक परिस्थितीमुळे आगामी पाच वर्षांत आजच्या दुप्पट क्षमता वाढविणे आवश्यक आहे. ३६ राफेल लढाऊ विमान खरेदी करण्यात येणार असली तरी ती उपलब्ध होण्यासाठी २०२२ उजाडेल. अशा अनेक बाबींचा विचार केला, तर अर्थसंकल्पात किती तरी मोठ्या प्रमाणात संरक्षण क्षेत्रात तरतूद करणे आवश्यक होते. देशांतर्गत युद्धसामग्री निर्माण करण्याकरिता खासगी व सरकारी कारखानदारी उभी करण्यासाठी कोणतीही खास तरतूद अंदाजपत्रकात नाही.

माजी सैनिकांच्या अनेक मागण्यांपैकी ‘वन रॅँक, वन पेन्शन’ ही महत्त्वाची मागणी आहे. त्या संदर्भातील उर्वरित मागण्या मान्य करण्यासाठी कोणतीही तरतूद केंद्राच्या अर्थसंकल्पात दिसलेली नाही. सैन्यदलात सेवा करताना पाच ते दहा वर्षांचा बॉँड पूर्ण केल्यास त्यांना पेन्शन दिली जाते; परंतु काही कारणांमुळे दहा ते बारा दिवसांची त्रुटी असेल, तर पेन्शन नाकारली जाते. कर्तव्य बजावताना ज्या सैनिकांनी २४-२४ तास सेवा केली आहे, त्यांचा विचारही या अर्थसंकल्पात झालेला दिसत नाही.- कॅप्टन अजित ओढेकर (निवृत्त)

भारतीय संरक्षण दलासाठी सरकार दर वर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करीत असते. आज सर्वाधिक शस्त्रास्त्रांची आपण आयात करतो. हा खर्च मोठा आहे. आजच्या आधुनिक युगात युद्धाचे स्वरूप बदलते आहे. त्यामुळे सैन्यदले ही आधुनिक होणे गरजेचे आहे. संरक्षणदलांच्या तरतुदीत आणखी वाढ होणे अपेक्षित होते.- दिलीप परुळकर, ग्रुप कॅप्टन (निवृत्त)

टॅग्स :budget 2020बजेटbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनDefenceसंरक्षण विभागIndiaभारत