शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Budget 2020: संरक्षणासाठी तरतूद समाधानकारक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 06:29 IST

तणावाच्या परिस्थितीत शस्त्रसामग्रीखरेदीची गरज

जागतिक आणि आपल्या आसपासच्या देशांची स्थिती बघितली, तर सर्वत्र तणाव आहे. अशा वेळी भारतीय सैन्यासाठी मोठ्या प्रमाणात शस्त्रसामग्री खरेदी करण्याची गरज असताना प्रत्यक्षात मात्र अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या अंदाजपत्रकात त्यासाठी अजिबातच समाधानकारक तरतूद केलेली नाही.

सरकारने जाहीर केल्यानुसार ४० दिवस पूर्ण क्षमतेने पारंपरिक युद्ध करता येईल इतका शस्त्रसाठा असल्याचे जाहीर केले असले, तरी बदलल्या जागतिक सामरिक परिस्थितीमुळे आगामी पाच वर्षांत आजच्या दुप्पट क्षमता वाढविणे आवश्यक आहे. ३६ राफेल लढाऊ विमान खरेदी करण्यात येणार असली तरी ती उपलब्ध होण्यासाठी २०२२ उजाडेल. अशा अनेक बाबींचा विचार केला, तर अर्थसंकल्पात किती तरी मोठ्या प्रमाणात संरक्षण क्षेत्रात तरतूद करणे आवश्यक होते. देशांतर्गत युद्धसामग्री निर्माण करण्याकरिता खासगी व सरकारी कारखानदारी उभी करण्यासाठी कोणतीही खास तरतूद अंदाजपत्रकात नाही.

माजी सैनिकांच्या अनेक मागण्यांपैकी ‘वन रॅँक, वन पेन्शन’ ही महत्त्वाची मागणी आहे. त्या संदर्भातील उर्वरित मागण्या मान्य करण्यासाठी कोणतीही तरतूद केंद्राच्या अर्थसंकल्पात दिसलेली नाही. सैन्यदलात सेवा करताना पाच ते दहा वर्षांचा बॉँड पूर्ण केल्यास त्यांना पेन्शन दिली जाते; परंतु काही कारणांमुळे दहा ते बारा दिवसांची त्रुटी असेल, तर पेन्शन नाकारली जाते. कर्तव्य बजावताना ज्या सैनिकांनी २४-२४ तास सेवा केली आहे, त्यांचा विचारही या अर्थसंकल्पात झालेला दिसत नाही.- कॅप्टन अजित ओढेकर (निवृत्त)

भारतीय संरक्षण दलासाठी सरकार दर वर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करीत असते. आज सर्वाधिक शस्त्रास्त्रांची आपण आयात करतो. हा खर्च मोठा आहे. आजच्या आधुनिक युगात युद्धाचे स्वरूप बदलते आहे. त्यामुळे सैन्यदले ही आधुनिक होणे गरजेचे आहे. संरक्षणदलांच्या तरतुदीत आणखी वाढ होणे अपेक्षित होते.- दिलीप परुळकर, ग्रुप कॅप्टन (निवृत्त)

टॅग्स :budget 2020बजेटbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनDefenceसंरक्षण विभागIndiaभारत