शहरं
Join us  
Trending Stories
1
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
2
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
3
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
4
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
5
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
6
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
7
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
8
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
9
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
10
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
11
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
12
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
13
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
14
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
15
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
16
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
17
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
18
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
19
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
20
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला

Budget 2020: गोंधळाची प्राप्तिकर योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 06:36 IST

भारताची साठ टक्के लोकसंख्या आजही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.

- विनायक कुळकर्णी

भारताची साठ टक्के लोकसंख्या आजही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. या क्षेत्राकडे व्यावसायिकपणे न पाहिल्याने या क्षेत्राची उत्पादन क्षमता कमीकमी होत चालली आहे. तसेच सध्या मागणी व पुरवठा यात वाढत जाणाऱ्या फरकामुळे अन्नधान्य महाग होत चालले आहे.

नैसर्गिक साधनसंपत्तीची जाणारी नासाडी, हवामानातील बदल, पाणीटंचाई, रासायनिक खतांचा भडिमार आदि घटकांमुळे कृषि उत्पादकतेवर विपरीत परिणाम झाला आहे. शेतमालाचे भाव ठरवणाऱ्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे राजकारण आणि त्यातील अडत्यांची कमिशनलक्ष्यी कृती आणि साठमारी यात बिचाऱ्या शेतकऱ्यांचे होणारे हाल व आर्थिक नुकसान होत आहे. भारतीय कृषि क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्याच्या उद्दिष्टानेच हा अर्थसंकल्प सादर केला आहे.

हे बदल करतानाच पर्यावरणपूरक आणि परिणामकारक घटक निश्चित करून तशी प्रत्यक्ष कृती केंद्र असो वा राज्य सरकारकडून करण्याच्या धोरणांचा पण उल्लेख यात आहे. थोडक्यात कृषी आणि कृषी पूरक क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देतानाच उत्पादित होणारा माल निर्यात कसा करता येईल याबाबत नेमका विचार मांडला आहे. सोलर उर्जेच्या निर्मितीवर अधिक लक्ष दिले आहे. सर्व लॉजिस्टिक कंपन्यांना राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाचा फायदा होईल. किसान रेल आणि किसान उडाण याचाही लाभच होईल. रस्ते, रेल्वे, बंदरे आणि विमानतळांची निर्मिती प्रकल्प उभारले जातील. यातून रोजगाराच्या संधी वाढतील. या सर्वांचा लाभ सिमेंट आणि स्टील कंपन्यांना होऊ शकतो.

आज १३७ कोटींच्या लोकसंख्येपैकी अवघे ३ टक्के आयकर भरतात. गत वर्षासाठी ५ कोटी ८७ लाख लोकांनी आयकर विवरण पत्रे भरली. त्यापैकी साडे तीन कोटी लोकांनीच प्रत्यक्ष आयकर भरला. एकूण आयकर विवरण पत्रे भरणाºया लोकांपैकी ७२ टक्के लोकांचे उत्पन्न अडीच लाख रुपये ते साडे नऊ लाख रुपये होते.

नेमकी हीच वस्तुस्थिती लक्षात घेऊन अर्थमंत्र्यांनी पर्यायी कररचना पगारदारांपुढे ठेवली. नव्या रचनेत पाच लाख रुपयांपर्यंत कोणताही आयकर देय नसणार. त्यानंतर प्रत्येक अडीच लाख रुपयांच्या स्तरावर कराचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढविले आहे. परंतु या पर्यायी कररचनेचा स्वीकार केल्यास काही वजावटी आणि आयकर सवलतींवर पाणी सोडावे लागणार आहे. त्यासाठी यात वगळलेल्या आयकर कलमांचा नीट अभ्यास करूनच नेमका निर्णय घ्यावा लागेल.

बँक ठेवीदारांची १९९३ पासूनची बँक ठेवींच्या विम्याच्या रकमेत वाढ करण्याची मागणी अखेर मान्य झाली आहे. प्रत्येकाला आता त्याच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवर ठेवी पत हमी महामंडळाकडून विमा संरक्षण उपलब्ध मिळेल. बजेटमध्ये उद्योग क्षेत्रांला भरीव काहीच न मिळाल्याने शेअरबाजार निर्देशांक आठशेहून अधिक अंशानी घसरला.

टॅग्स :budget 2020बजेटbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाIncome Taxइन्कम टॅक्सMaharashtraमहाराष्ट्रNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन