शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर खंडित वीजपुरवठा लवकर पूर्ववत होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 05:16 IST

महावितरणच्या पुनर्रचनेबाबत कामगारांचा दावा; कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडल्यास दुरुस्तीस लागणार वेळ

- सचिन लुंगसे मुंबई : महावितरणची पुनर्रचना करताना प्रशासनाने कामगारांची भरती केली पाहिजे. कारण सद्य:स्थितीत महावितरणच्या सुमारे ८० हजार ९०० जागा मंजूर असल्या तरी प्रत्यक्षात कार्यरत कामगारांची संख्या ५५ हजार आहे. म्हणजे ३० ते ३५ टक्के जागा रिक्त आहेत. परिणामी, कामगारांच्या भरतीकडे दुर्लक्ष करून पुनर्रचना करण्यात आली, त्यानंतर एखाद्या भागात वीजपुरवठा खंडित झाला आणि तो पूर्ववत करण्यासाठी कामगारांची संख्या अपुरी पडली तर दुरुस्ती कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे, असा दावा महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केला.प्रथमत: महावितरणच्या भांडुप परिमंडळातील वाशी आणि ठाणे सर्कल, पुण्यात गणेश खिंड आणि पुणे अर्बन सर्कल, कल्याण या तीन सर्कलमध्ये पुनर्रचना करण्यात येईल. हा भाग पूर्णत: शहरी आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांत येथे वीज ग्राहक मोठ्या संख्येने वाढले आहेत. उपकेंद्र, लाइन्स वाढल्या आहेत. या घटकांप्रमाणेच पायाभूत सेवासुविधाही वाढल्या आहेत. पुनर्रचनेनुसार शहरीकरण असल्याने येथे चार उपविभाग असतील तर त्याचे दोन उपविभाग करण्यात येतील. एका विभागात वीज ग्राहकांना वीज बिल देणे, विजेच्या बिलानुसार पैसे वसूल करणे, बिल न भरल्यास नोटीस देत जोडणी तोडणे, ग्राहकाच्या तक्रारी सोडविणे; असा एक विभाग असेल. दुसºया विभागाअंतर्गत ग्राहकांना ज्या जोडण्या दिल्या आहेत; त्या जोडण्यांवर काही अडचणी आल्यास त्या सोडविणे, वीजपुरवठा सुरळीत ठेवणे आणि ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करणे आदी कामे करण्यात येतील.ठाणे शहराचा विचार करता जेव्हा चार विभागाचे दोन विभाग केले जातील आणि सेक्शन म्हणजे प्रत्येक भागात एक-एक सेक्शन केले तर तेथे सेक्शन इंजिनीअर, अठरा कामगार काम करीत होते तेथे नव्या पुनर्रचनेनुसार अठरा कामगार आणि सेक्शन इंजिनीअर राहणार नाहीत. हे सगळे कामगार एका उपविभागात येतील. एका शिफ्टचा विचार केला तर एका शिफ्टमध्ये एक इंजिनीअर आणि दहा कामगार अशी शिफ्ट राहील. म्हणजे चार शिफ्टमध्ये चार इंजिनीअर आणि चाळीस कामगार असतील. यापूर्वी एका उपविभागात अशी स्थिती नव्हती.महावितरणची पुनर्रचना करण्यात आल्यास शहरी भागात अडचणी येतील. समजा एखाद्या भागात वीजपुरवठा खंडित झाला; तर तेथे काम करत असलेल्या कामगाराला तेथील जाळे माहीत असायचे. आता चारही सेक्शनमधील कामगार एका ठिकाणी काम करतील आणि उपविभागातून नियंत्रण राहील. समजा येथे वीजपुरवठा खंडित झाला तर तो वीजपुरवठा सुरळीत होण्यास वाढीव कालावधी लागेल. परिणामी, वीज ग्राहकांमध्ये संताप निर्माण होईल. पर्यायाने हा संताप किंवा रोष कामगारांवर येईल.प्रशासनाचा निर्णय एकतर्फीपुनर्रचनेला विरोध नाही. मात्र मोठा बदल करताना ग्राहकाला वेळेत सेवा मिळाली पाहिजे; ही सहाही कामगार संघटनांची मागणी आहे. प्रशासनाने प्रस्ताव मांडला तेव्हा कामगार संघटनांकडूनही प्रस्ताव मागविण्यात आले होते. आम्ही सूचना सुचविल्या. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर कामगार संघटनांचा प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा त्यांनी कौतुक केले. ऊर्जामंत्र्यांनी महावितरणच्या प्रशासनाला कामगार संघटनांच्या सूचना लक्षात घ्या, असे म्हटले होते. सहकार्य करीत कामगार संघटनांना सर्व माहिती देत निर्णय घ्या, असेही ऊर्जामंत्री म्हणाले होते. मात्र महावितरण प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेत अंमलबजावणी केली. परिणामी, प्रशासन आणि कामगार संघटनांत मतभेद झाले. त्यामुळे कामगार संघटनांनी संप पुकारला.- कृष्णा भोयर, सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनया आहेत कामगारांच्या मागण्याज्या ठिकाणी कामगारांची संख्या कमी आहे; तेथे कामगारांची भरती करा.८० हजार ९०० जागा मंजूर आहेत. प्रत्यक्षात काम करीत असलेले कामगार ५५ हजार आहेत. ३० ते ३५ टक्के जागा रिक्त आहेत.पुनर्रचना करताना रिक्त जागा भरा.रिक्त जागा न भरता पुनर्रचना केली तर पुरेसे कामगार उपलब्ध होणार नाहीत.कंत्राटी कामगारांची भरती करणे हा कायमस्वरूपी उपाय नाही.कायमस्वरूपी कामगारांची भरती करा.कामगार सरप्लस झाले तर काय करणार? या प्रश्नाचे उत्तर महावितरणकडे नाही.पदोन्नतीची संधी दिली पाहिजे.ज्या प्रमाणे ग्राहक संख्या वाढते आहे; त्या प्रमाणे कर्मचारी संख्या वाढली पाहिजे.कामगार संघटनांसोबत बैठक घ्या आणि काय मागण्या मान्य केल्या ते सांगा.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज