शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात ब्रिटिशकालीन ४४ पूल, सर्वच सुस्थितीत व वाहतूक योग्य

By admin | Updated: August 4, 2016 18:04 IST

अमरावती महसूल विभागात ब्रिटिशकालीन तब्बल ४४ पूल असून सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात आहे. हे सर्व पूल सुस्थितीत आणि वाहतुकीस योग्य असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम खात्याने केला आहे

- राजेश निस्ताने

यवतमाळ, दि. ४ : अमरावती महसूल विभागात ब्रिटिशकालीन तब्बल ४४ पूल असून सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात आहे. हे सर्व पूल सुस्थितीत आणि वाहतुकीस योग्य असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम खात्याने केला आहे. कोकणातील महाडचा ब्रिटिशकालीन पुल वाहून गेल्याने अनेक वाहने त्यात पडली आणि नदीत वाहून गेली. या पुलाची आयुष्य मर्यादा संपल्याने तो धोकादायक असल्याचे तीन वर्षांपूर्वीच जाहीर करण्यात आले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले आणि अनेकांचा बळी घेणारी घटना पूल वाहून गेल्याने घडली.

महाड घटनेच्या निमित्ताने राज्यभरातील ब्रिटिशकालीन पुलांच्या सद्यस्थितीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अमरावती विभागातील ब्रिटिशकालीन पुलांची संख्या व स्थितीचा आढावा घेतला असता सकारात्मक चित्र पुढे आले.

सूत्रानुसार, पश्चिम विदर्भात ब्रिटिशकालीन एकूण ४४ पूल आहेत. त्यामधील सर्वाधिक २७ पूल एकट्या अमरावती जिल्ह्यात आहेत. त्यातही मेळघाटात या पुलांची संख्या अधिक आहे. बुलडाणा जिल्ह्यात १२, अकोला जिल्ह्यात चार तर यवतमाळ जिल्ह्यात एक ब्रिटिशकालीन पुल आहे. वाशिम जिल्ह्यात ब्रिटिशकालीन एकाही पुलाची नोंद नाही. यातील १८ पुल हे स्टोन आर्च असलेले, १६ पूल हे वाय आर्च असलेले तर दहा स्लॅब असलेले आहेत. विभागातील हे सर्व ४४ पूल सुस्थितीत आणि वाहतुकीस योग्य असल्याचा दावा बांधकाम खात्याने केला आहे.

पुलांची उंची आणि रुंदी वाढविणार४४ पैकी काही पुलांची उंची आणि रुंदी कमी आहे. त्यामुळे वाहतुकीत काहीशा अडचणी निर्माण होतात. त्या दूर करण्यासाठी या पुलांची उंची व रुंदी वाढविण्याचे प्रस्ताव आहे. अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह ते अचलपूर मार्गावरील एक ब्रिटिशकालीन पुल पाडून नव्याने बांधकाम केले जाणार आहे. कारण हा पूल अरुंद आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव आणि बजेट नुकतेच मंजूर झाले आहे. ब्रिटिशांनी १९३० नंतर केलेल्या पुलांचे बांधकाम स्लॅबचे आणि उत्तम आहे.

या पुलांना पुढील आणखी कित्येक वर्ष काहीच धोका नाही. यवतमाळ जिल्ह्यातील अडाण नदीवर बांधलेल्या बोरीअरबच्या पुलाची अलिकडेच दुरुस्तीही करण्यात आली होती. या पुलाची उंची काही प्रमाणात कमी होती. परंतु आता तेथून वाहतुकीला कोणतीही अडचण नाही.

विदर्भ विकासाच्या कालबद्ध कार्यक्रमातून १५ वर्षांपूर्वी ब्रिटिशकालीन पुलांचे नूतणीकरण व दुरुस्ती करण्यात आली. त्यात अमरावती विभागातील बहुतांश पुल सुस्थितीत करून घेण्यात आले. त्यामुळेच आज या पुलांना कोणताही धोका नसून तेथून वेगवान वाहतूक करणे सहज शक्य असल्याचे बांधकाम सूत्रांनी सांगितले. विभागातील पूलजिल्हा - संख्याअमरावती - २७अकोला - ०४बुलडाणा - १२यवतमाळ - ०१एकूण - ४४ अमरावती विभागाच्या चारही जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन ४४ पुलांची कोणतीही समस्या नाही. आवश्यकता पडेल तेव्हा या पुलांची देखभाल दुरुस्ती केली जाते. - शेखर तुंगे, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम, अमरावती

 

आणखी वाचा 

वर्धेतील २५ पुल मरणपंथाला, पुलगावचा पुल तर १५० वर्ष जुना