शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

हे तर ‘ब्रेकिंग इंडिया’ बजेट

By admin | Updated: February 28, 2015 23:37 IST

‘मेक इन इंडिया’च्या बाता मारणाऱ्या सरकारचे हे ‘ब्रेकिंग इंडिया’ बजेट आहे, अशी जळजळीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पुण्यात केली.

पुणे : हे बजेट केवळ उद्योगक्षेत्राचे हित जपण्यासाठी तयार केले असून केंद्र सरकारने यात शेतकऱ्यांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. ‘मेक इन इंडिया’च्या बाता मारणाऱ्या सरकारचे हे ‘ब्रेकिंग इंडिया’ बजेट आहे, अशी जळजळीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पुण्यात केली.संध्याकाळी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी म्हणाले, ‘‘९ महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना भरपूर आश्वासने दिली होती. त्यामुळेच देशातील शेतकरी वर्गाने भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान केले आणि सत्तापरिवर्तन घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. मोदींनी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची वेळ आल्यावर मात्र सरकार मागे फिरले आहे. शेतमालाच्या उत्पादनाला खर्चाच्या तुलनेत किमान ५० टक्के अधिक किंमत देऊ, या निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनापासूनही मोदी घूमजाव करीत आहेत. या बजेटने शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे.’’ देशात शेतीनंतर वस्त्रोद्योग सर्वांत मोठा आहे. त्याबाबत बजेटमध्ये एकही शब्द नसल्याकडे शेट्टी यांनी लक्ष वेधले. ‘‘दूध, ऊस, साखरेचा समस्या सुटलेल्या नाहीत. त्याच्या सोडवणुकीसाठी तरतूद अपेक्षित होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी योजना जाहीर करणे अपेक्षित असताना या बजेटमध्ये त्याबाबत साधा उल्लेखदेखील नाही. ठराविक लोकांसाठी हे बजेट जाहीर करून केंद्रसरकारने देशातील ६५ टक्के ग्रामीण जनतेच्या तोंडला पाने पुसली आहेत. हे बजेट केंद्र सरकारच्या आगामी कामगिरीची ब्लू प्रिंट आहे. शेतीच्या हिताची धोरणे न राबवणे ही शेतकऱ्यांशी प्रतारणा आहे, ’’ अशी टीका शेट्टी यांनी केली. पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या १४ आणि १५ तारखेला पुण्यात राज्यस्तरीय बैठक आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.